नवाब मलिक यांची भाजपावर कडवी टिका; पहा काय म्हणाले मलिक.

बीड दि.20 डिसेंबर – ‘भाजप हा पक्ष राज्यातील चोरांची वरात आहे. तर, किरीट सोमय्या हे या वरातीचे बँड बाराती आहेत. माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, मी त्यांच्यासाठी चहा बिस्कीटे तयार ठेवली आहेत. माझ्याविरोधात तपास यंत्रणांना कितीही कारवाया करायला सांगितल्या तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपवर निशाणा साधला.
(Nawab Malik’s harsh criticism of BJP; See what Malik said.)
राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) नवाब मलिक आज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्यातील आष्टी व वडवणीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात प्रचारसभेत त्यांनी जनतेला संबोधित केले. मलिक यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आष्टी व वडवणी येथील अल्पसंख्यांक मतदारावर किती प्रभाव पडणार याकडे लक्ष लागले आहे.
भाजपाकडून (BJP) राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात सूडबुद्धीने तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात एक वेगळी परस्थिती निर्माण झाली आहे. काही नेते स्वतःला राजकीय चाणक्य समजत होते. मात्र आमच्या चाणक्याने सगळ्यांना मात देऊन सरकार आणलं, असे म्हणत नवाब मलिकांनी भाजपला टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात कोविड (Covid) सारखी परिस्थिती निर्माण झाली. पण याला जबाबदार कोण हा प्रश्न कोणी विचारत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमची मागणी होती परदेशातील विमान बंद करा, मात्र हर्षवर्धन नावाचे मंत्री म्हणाले देशात कोरोना (Corona) येणार नाही. नमस्ते टर्म देशात होणार होता त्यामुळं यांनी विमानसेवा बंद केली नाही. पण महाराष्ट्रात एकाही रुग्णांचा ऑक्सीजनविना मृत्यू नाही, असा खुलासाही त्यांनी केला.
यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या पुणे दौऱ्यावरही टीका केली. अमित शहा म्हणाले निवडणुकी घ्या, मग पाहू, साहेब 6 महिन्याआधी लोकसभा निवडणूक झाली आमचीही निवडणूक घ्यायची तयारी आहे. आज देशात निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोधकांवर आसूड ओढला.