स्वतःच्या मुलीने अशी केली आई वडीलांची हत्या….

इंदूरः २० डिसेंबर- काल दि.१९ रोजी छोटा बांगडदा येथील रुक्मिणी नगर येथे १५ व्या बटालियनचे सैनिक ज्योतिप्रसाद शर्मा आणि त्यांची पत्नी नीलम यांच्या हत्येचं कारस्थान त्यांच्या अल्पवयीन मुलीने आखल्याचे समोर आले आहे. तिला प्रियकर धनंजयबरोबर राहायचे होते. मात्र तिचे आई-वडील तिच्यावर निर्बंध लावत होते. यावर तिने स्वत: त्यांना मारण्याचा कट रचला आणि भाजीमध्ये १२ झोपेच्या गोळ्या मिसळल्या. दोघेही गाढ झोपताच तिने आरोपी धनंजय यादव कडून चाकूने हत्या (Murder) केली. हत्येनंतर पळून गेलेली अल्पवयीन मुलगी आणि प्रियकर धनंजय यांना गुरुवारी रात्री मंदसौरमधील कैलास मार्गावरील हॉटेलमधून पोलीसांनी (Police) अटक केली.

डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, ज्योतिप्रसादची १६ वर्षांची मुलगी केंद्रीय विद्यालयात दहावीत शिकते. दोन वर्षांपासून तिचं गांधीनगर येथे राहणाऱ्या धनंजयशी प्रेमसंबंध होते. पण ज्योतीप्रसाद यांना मुलीचे धनंजयला भेटणे पसंत नव्हते. त्यामुळे मुलीने आई व वडील दोघांनाही मार्गातून हटविण्याचा कट रचला. धनंजय याने दिलेल्या कबुली जवाबानुसार, मला ज्योतिप्रसादची अल्पवयीन मुलगी आवडते. मात्र तिचे आई-वडील आम्हाला त्रास देत होते. कधीही मोबाइल तपासतात. दोन दिवसांपूर्वीही आम्हा दोघांना रोहितच्या फ्लॅटमध्ये त्यांनी पाहिले होते. याशिवाय मुलीच्या भावाचे मित्रही माझा पाठलाग करीत होते. मुलीने सांगितले की, त्यांना मारणं गरजेचं आहे. या कटाचा भाग म्हणून, एक दिवस आधी, मी गांधीनगर येथून ५०० रुपयांना चाकू विकत घेतला. संध्याकाळी चारच्या सुमारास मी मित्राची स्कूटर घेऊन आलो आणि ज्योती व नीलम यांना ठार मारल्यानंतर मी तेथून पळ काढला, असं आरोपी धनंजयने पोलिसांना सांगितलं.

अल्पवयीन मुलीचा जबाब…

यानंतर ज्योतिप्रसाद यांच्या १६ वर्षांच्या मुलीने सांगितलं की, मी आई-वडिलांना वैतागले होते. धनंजयला भेटणं त्यांना पसंत नव्हतं. यामुळे घरातील वातावरणही बिघडलं होतं. रोज आमच्यात वाद होत होता. सुरुवातीला मी धनंजय सोबत पळून जाण्याचा विचार केला. मात्र मला वडिलांनी कुठूनही शोधून काढलं असतं. कारण ते पोलिसात (Police) आहेत. त्यामुळे त्यांना मारण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या आई-वडिलांच्या हत्येसाठी धनंजयला तयार करण्यात आलं आणि आदल्या दिवशी त्याच्याकडून झोपेच्या गोळ्या मागवल्या. धनंजय मेडिकल स्टोरमधून झोपेच्या गोळ्या आणण्यासाठी गेला. मात्र डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्याला गोळ्या दिल्या नाही. मुलीने जबरदस्ती केली, त्यामुळे त्याने दुसऱ्या गोळ्या आणून दिल्या. ठरलेल्या कारस्थानानुसार त्या दिवशी सायंकाळी मुलीने स्वयंपाक केला. आणि आई-वडिलांसाठी वेगळी भाजी केली. एका भाजीत धनंजयने दिलेल्या गोळ्या टाकल्या. ज्योतिप्रसाद दारूच्या नशेत होते. रात्री उशिरापर्यंत ती त्यांच्या झोपण्याची वाट पाहत होती. जसे दोघे गाढ झोपेत गेले, तिने धनंजयला बोलावलं. मुलगी दरवाजा उघडून कुत्रा फिरविण्याच्या बहाण्याने बाहेर गेली. धनंजय सरळ नीलम जवळ गेला आणि तिच्यावर वार करू लागला. आवाज ऐकून ज्योतिप्रसाद बेडरुमबाहेर आले. ते स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र दारुच्या नशेत असल्याने त्यांना स्वत:ला वाचवणं जमलं नाही व त्यांचीही हत्या (Murder) करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!