मराठा व्यवसायिकांना कर्ज मिळवण्यासाठी घ्यावा लागतो उपोषणाचा मार्ग

किल्लेधारूर दि.२१(वार्ताहर) तालुक्यातील अंजनडोह येथील रहिवासी व्यवसायिक पुरुषोत्तम सदाशिव सोळंके Solanke यास अण्णासाहेब पाटील Annasaheb Patil आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज मंजूर झालेले असताना स्टेट बँक अॉफ इंडिया या बँकेकडून टाळाटाळ होत असल्याने दि.२४ नोव्हेंबर रोजी बँक शाखेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संबंधिताने निवेदनाद्वारे दिला आहे. हक्काच्या आर्थिक महामंडळाकडून  लाभ मिळवण्यासाठी बँकेच्या Bank उदासिन धोरणामुळे मराठा व्यवसायिकाना थेट उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागत असल्याचे दिसत आहे.

मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळावी या हेतूने राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील Annasaheb Patil आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे. या महामंडळास नुकतीच मोठी आर्थिक तरतूदही विद्यमान राज्य सरकारने केली आहे. परंतू बँकेच्या Bank बेजबाबदार धोरणामुळे सदरील योजनेतही सुशिक्षित बेरोजगार व होतकरु व्यवसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापुर्वीही अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत. तालुक्यातील अंजनडोह येथील पुरुषोत्तम सोळंके यांनी सहा वर्षापूर्वी सुशिक्षित बेरोजगार योजनेतून कर्ज प्रकरण करुन धारुर शहरात हॉटेल व्यवसाय करतात. सदरील कर्ज विहीत वेळेत परतफेडही केली. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी आण्णासाहेब पाटील Annasaheb Patil आर्थिक विकास महामंडळाकडे कर्ज मागणी केली. या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. परंतू जवळजवळ वीस महिने उलटूनही स्टेट बँकेच्या SBI धारुर येथील तेलगाव रोड शाखेने सदरील कर्ज प्रकरण देण्यास टाळाटाळ केली. या त्रासामुळे शेवटी त्यांना कर्ज मिळवण्यासाठी आमरण उपोषाणाचा मार्ग स्विकारावा लागत आहे. दि.१८ नोव्हेंबर रोजी त्यांनी निवेदनाद्वारे दि.२४ नोव्हेंबर रोजी भारतीय स्टेट बँकेच्या SBI समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मराठा समाजातील हरहुन्नरी नव उद्योजक व व्यवसायिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आजही उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!