दुचाकीधारकांनो सावधान…. हेल्मेटचा नवा कायदा लागू; होवू शकतो पाच लाखाचा दंड व एक वर्षाचा तुरुंगवास.

नवी दिल्ली दि.8 जून – भारतात बनावट हेल्मेटच्या वापरावर 1 जून 2021 पासून बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे. आयएसआय (ISI) मार्क असलेले बनावट हेल्मेट विकणारा व विकत घेणारा या दोघांनाही आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अशा कारवाईत पाच लाख रुपयांचा दंड व एक वर्षाचा तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
(New helmet law applied; A fine of Rs 5 lakh and one year imprisonment.)
आपण दुचाकीधारक असाल तर तुम्ही जेथून हेल्मेट खरेदी करणार असाल तिथे नीट पाहणी आणि खरेदी केल्यांनंतर पुन्हा तपासणी करणे गरजेचे आहे. तुम्ही जे हेल्मेट (helmet) खरेदी करत आहात, ते सर्व आयएसआय मानके पूर्ण करते का? तसे प्रमाणपत्र आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. याचाच अर्थ 1 जूनपासून सर्व दुचाकीस्वारांना आयएसआय मार्क हेल्मेट असणे बंधनकारक झाले आहे. हे हेल्मेट ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड सर्टिफाइड (BIS) असणे गरजेचे आहे.
काय आहे नवीन नियम?
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 26 नोव्हेंबर 2020 मध्ये एक अधिसुचना काढली. या दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट गुणवत्ता आदेश, 2020 मध्ये ही हेल्मेट बीआयएस (BIS) प्रमाणित असायला हवी, असे म्हटले होते. या हेल्मेटवर आयएसआयचे चिन्ह असायला हवे.
रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात (accident) कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम न पाळणाऱ्यांना पाच लाखांचा दंड आणि एक वर्षांचा कारावास देखील भोगावा लागणार आहे. जो कोणी आयएसआय सर्टिफाईड नसलेले हेल्मेटचे उत्पादन करेल, विक्री करेल त्याला एक वर्षाची शिक्षा किंवा कमीतकमी एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. हा दंड 5 लाखांपर्यंत केला जाऊ शकतो. असे हेल्मेट (helmet) वापरणाऱ्यांवर देखील वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात.
नवा नियम कशासाठी
सर्वसाधारणपणे रस्त्याच्या कडेला खराब दर्जाचे हेल्मेट विक्री मोठ्या प्रमाणात होते. आयएसआय मानांकन नसलेली दर्जेदार नसणारी अशी हेल्मेट विक्री थांबवणे यामागचा उद्देश आहे. असे दर्जाहिन हेल्मेट रस्ते अपघात (accident) रोखण्यात मदत करत नाहीत. म्हणून हा नवीन नियम करण्यात आला आहे.