दिल्लीतील निर्भयाकांडची मुंबईत पुनरावृत्ती; महिला अत्यवस्थ.

मुंबई दि.10 सप्टेंबर – आठ वर्षापूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भयाकांडची (Nirbhaya incident) आठवण करुन देणारी घटना मुंबईत रात्री उघडकीस आली आहे. मुंबईला हादरवणारी घटना उपनगरातील साकीनाका परिसरात घडली आहे. एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) केल्यानंतर विकृताने पीडितेच्या गुप्तांगात सळई टाकून वार केला.

(Nirbhaya incident repeated in Mumbai; Women in critical condition.)

सदरील घटना 9 सप्टेंबरला रात्री 3 च्या दरम्यान घडली. या संतापजनक घटनेमुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पीडितेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं असून त्या विकृताला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

नक्की काय घडलं?
पोलीस कंट्रोल रुमला (Police control room)  9 ऑगस्टच्या मध्यरात्री 3 वाजता फोन आला. त्या फोनवरुन एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार देण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. अधिकारी आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोहचल्यानंतर पोलिसांनी पीडिता जखमी अवस्थेत सापडली.

पोलिसांनी पीडितेला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयत दाखल केलं. पीडिता गंभीर जखमी असून प्रकृती चिंताजनक आहे. तसेच पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर (private part) सळीने मारल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून (Police) अधिक तपास केला जात आहे.

या संतापजनक घटनेचे सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्त्री अत्याचाराच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघत आहेत. या घटनेमुळे आठ वर्षापूर्वी दिल्लीत (Delhi) चालत्या बसमध्ये घडलेल्या निर्भयाकांडची आठवण केले जात आहे. या निर्भयाकांडनंतर संपुर्ण देशभर संतापाची लाट निर्माण झाली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!