धारुर मध्ये पाच पैकी एक ग्रामपंचायत होणार बिनविरोध…. पहा कुठे किती आलेत अर्ज

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) तालुक्यातील पाच ग्रामपंचायतची निवडणूक (Election) सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एकुण १३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या पाच ग्रामपंचायत पैकी कोथींबीरवाडी ग्रामपंचायत (Gram Panchayat) साठी सात जागेसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध निघणार आहे.
तालुक्यातील जहागिरमोहा, रुई धारूर, कोथिंबीरवाडी, भोपा, कासारी बोडखा या पाच ग्रामपंचायतीचा निवडणूकीचा (Election) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दि.२३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागवण्यात आली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत तिन ग्रामपंचायतीचे एकही अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सकाळ पासूनच तहसिल कार्यालयाच्या परिसरात गर्दी वाढली होती. तिन ग्रामपंचायतींनी सर्व अर्ज एकाच दिवशी भरले आहेत. या मुळे अर्ज भरतांना गर्दी वाढली होती. शेवटच्या दिवशी पर्यंत जहागिरमोहा -३५, रुई धारूर -३१, भोपा-१६, कासारी-४९, कोथींबीरवाडी -७ अर्ज दाखल झालेे आहेत . कोथींबीरवाडी ग्रामपंचायत (Gram Panchayat) मध्ये एकुण सात जागांसाठी निवडणूक होत असून या सातही जागेवर प्रत्येकी एक अर्ज आला असल्याने ग्रामपंचायत ची वाटचाल बिनविरोध च्या दिशेने झाली असून बिनविरोध निवड होणारी तालुक्यातील ती एकमेव ग्रामपंचायत असणार आहे.