भाजपाच्या पराभवावर पंकजाताई मुंडे यांची प्रतिक्रिया….

मुंबई दि.05 डिसेंबर: पुणे आणि नागपूर हे भाजपचे बालेकिल्ले ढासळल्या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार शरसंधान केलं. भाजपच्या (BJP) नेत्या पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी या पराभवावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पराभव स्वीकारला पाहिजे, पराभवाची कारणेही शोधली पाहिजे. शिवसेनेला (Shivsena) सुद्धा मित्रपक्षाची कमतरता जाणवली असेल असं मत व्यक्त केलं.
पदवीधर मतदारसंघांमध्ये झालेल्या पराभवाने भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. यात भाजपाचे पारंपारिक मतदारसंघात पराभव झाल्यानंतर परस्परांवर आरोप प्रत्यारोप करण्याची शृंखला सुरु झाली. या पराभवावर भाजप (BJP) कोअर कमिटीच्या सदस्य तथा राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया आपली दिली. विजयाचा कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) बोलतात पुढील 25 वर्षे सत्तेत राहू असं होत नसतं. तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे आमचा पराभव झाला हे मान्य आहे. मात्र येत्या काळात आमची स्ट्रटिजी वेगळी असेल. शिवसेनेला (Shivsena) आता आत्मपरीक्षण करावं लागेल. शिवसेनेच्या पाठीत अमरावतीमध्ये राष्ट्रवादीने खंजीर खुपसला असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजपच्या कोअर कमेटीची काल मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीतही निवडणूक निकालांबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.