परमबीर सिंहाचा दावा खोटा; पत्रातील मजकूर व अधिकाऱ्यांच्या जबाबात तफावत.

मुंबई दि.8 एप्रिल – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी गोळा करण्याचे आदेश सचिन वाझेला दिल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांकडे पत्रातून केला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रामध्ये ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केला गेला, त्या दोन अधिकाऱ्यांचा जबाब आणि परमबीर सिंग यांचा पत्रातील दाव्यामध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सदरील पत्रामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले असून देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला तर आता याच प्रकरणात अनिल परब यांची इंट्री झालेली आहे.
(Parambir Singh’s claim is false; Differences in text of letter and reply of officers)
सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरण आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहविभागाला अहवाल सादर केला आहे. यात परमबीर सिंह यांनीच सचिन वाझेंना पोलीस दलात आणण्यापासून महत्त्वाची कामे दिली हे स्पष्ट होत आहे.
परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचा जबाब समोर आला आहे. सहाय्यक पोलीस आयु्क्त संजय पाटील आणि गु्न्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजू भूजबळ यांचा जबाब नोंदवला आहे. संजय पाटील यांनी 100 कोटीं बाबतची नोंद जबाबात केलेली नाही. या दोन अधिकाऱ्यांच्या जबाबाने परमबीर सिंग यांच्या पत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रामध्ये संजय पाटील यांच्या चॅटचा उल्लेख केला होता. ‘सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्या भेटीनंतर पाटील यांना 1 हजार 750 बार अँड रेस्टॉरंट आहेत, त्या प्रत्येकाकडून ३ लाख गोळा करण्यास सांगितल्याचं सांगितलं, असं परमबीर यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.’ मात्र, संजय पाटील यांनी नोंदवलेल्या जबाबात आणि परमबीर सिंग यांच्या पत्रात मोठी तफावत असून या जबाबावरुन सिंह यांच्या पत्राचा अर्थच उलटत आहे.
संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबाबत असं म्हटलं आहे की, “तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी 1750 बार आणि रेस्टॉरंट आस्थापना मुंबईमध्ये असून तीन लाखाप्रमाणे जमा होतात अशी त्यांना माहिती मिळाली होती त्याची त्यांनी वाझेंकडे विचारणा केली होती. हे सचिन वाझे यांनी मला सांगितलं असं पाटील यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे.” या जबाबावरुन परमबीर यांनी जे पत्रात म्हटलं आहे की, 100 कोटी गोळा करण्याचे आदेश दिले होते, तो दावा या जबाबात दिसून येत नाही.
राजू भुजबळ आणि संजय पाटील 4 मार्च 2021 रोजी अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर त्यांना भेटले असल्याचा उल्लेख परमबीर सिंह यांनी केला आहे. मात्र या तिघांची एकत्र बैठक झाली नसल्याचं या दोन्ही अधिकार्यांनी जबाब दिला आहे. 4 मार्च रोजी आपण अधिवेशनाच्या ब्रिफींगसाठी गृहमंत्र्यांना ज्ञानेश्वरीवर भेटलो, तेव्हा संजय पाटील तिथे नव्हते, मी बाहेर पडताना दारात मला संजय पाटील भेटल्याचा भुजबळ यांनी सांगितलं. या जबाबमुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रावरील दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.