‘त्या’ अत्याचार प्रकरणात धारुरचे आरोपी; पहा अल्पवयीन पीडितेची आपबीती…

अंबाजोगाई दि.14 नोव्हेंबर – अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन विवाहितेवरील अत्याचार प्रकरणात धारुर (Dharur) तालुक्यातील आरोपींचा समावेश असून याप्रकरणात 400 जणांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) आर. राजास्वामी यांनी या प्रकरणी जर एखादा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.
(Dharur accused in rape case; See the plight of the minor victim …)
अंबाजोगाई तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) फुटपाथवर जीवन जगण्याची वेळ आली. याचा गैरफायदा घेत अनेकांनी तिच्यावर अत्याचार (Rape) करुन शरीराचे लचके तोडले आहेत. पंधरा दिवसांपुर्वी झालेल्या अत्याचारानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपानंतर अल्पवयीन मुलीने अंबाजोगाई पोलीसांत (Police) तक्रार दिली. यानंतर मात्र अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम समोर आला.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीत (complaint) म्हटले आहे, की माझे वडील व माझा भाऊ तालुक्यातील गावात रहातो. माझी आई मी 8 वर्षाची असताना मयत झालेली आहे. माझे 5-7 वी पर्यंतचे शिक्षण वसुंधरा प्राथमिक विद्यालय चनई येथे शिक्षण झाले. तेव्हा मी सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह चनई येथे राहत होते.
7 वी नंतर मला माझे वडीलांनी माझे गावी नेले. त्यानंतर लगेच अंदाजे 19.5.2018 रोजी, मी 13 वर्षाची असताना माझ्या वडीलांनी माझे बळजबरीने धारुर येथील तरुणाशी घाटनांदुर ता. अंबाजोगाई येथे लग्न लावले. माझ्या लग्नाला माझा नवरा, नणंद तसेच माझे, माझा मोठा चुलता, लहान चुलती व घाटनांदुर येथील ब्राम्हण व इतर काही लोक हजर होते .
लग्नानंतर मी, माझी आजी सासु असे अंबाजोगाई येथे राहत होतो. त्यावेळी माझा नवरा धारुर येथे कामाला जात होता व माझा नवरा अधुनमधुन धारुर वरुन येत असे. तेव्हा आमच्यात शारिरीक संबंध येत होते. माझा नवरा अधुनमधुन मला हाताच्या चापटीने मारहाण देखील करत होता. म्हणुन मी 14 जानेवारी 2019 रोजी रागाने माझे माहेरी आले व तेथेच वडील व भाऊ यांच्याबरोबर राहु लागले.
मी माहेरी राहत असताना माझे वडील मला म्हणत असे की, तु तुझा नवरा सोडुन आमच्याकडे का राहायला आलीस. “नवरा नको वाटतो तर ये माझे जवळ”असे म्हणुन लैंगिक संबंधासाठी माझे शरीराला स्पर्श करीत होते. हाताच्या चापटीने मारहाण देखील करत होते. म्हणुन त्यांना कंटाळुन मी घरातुन निघुन अंदाजे जुन 2021 पासुन अंबाजोगाई येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या बसस्टॉपवर राहत आहे. व भीक मागून उपजिवीका भागवत आहे.
मी एकटी राहते याचा गैर फायदा घेऊन अंबाजोगाई येथील एका अँकडमीतील दोघांनी 15 दिवसापुर्वी जेवायला देतो, असे म्हणुन आडस रोडला मोकळ्या जागेत माझेवर दोघांनी मिळुन बळजबरीने बलात्कार केला. यातील एक आरोपी गावदंरा ता.धारूर व दुसरा चाटगाव ता. धारूर यांनी माझेवर बलात्कार (Gang Rape) केला म्हणुन मी ग्रामीण पोलिस ठाणे अंबाजोगाई येथे येवुन कायदेशीर तक्रार दिली आहे.
या अल्पवयीन मुलीची माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे, मानवलोक मनस्विनी प्रकल्पचे बालाजी वाघमारे, शोभा किरवले यांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना भेटले. यावेळी मुलीची आपबीती ऐकून तिला धिर देत, तात्काळ सुत्रे हलवत, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावयास लावून योग्य दिशेने तपास करावा, अशा सुचना केल्या.
या गुन्हयाचा तपास पिंक पथक प्रमुख महिला पो.उपनिरीक्षक (PSI) व्हि.पी.पेठकर यांनी यातील पीडितेच्या वडिलांसह तीन आरोपीस अटक केली आहे. एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. दरम्यान या प्रकरणी गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई (Shambhuraje Desai) बीडच्या पोलिस अधिक्षकांना फोन करुन कारवाईचे आदेश दिले आहेत. घटनेची निपक्षपाती चौकशी करा चौकशीत कुठलही राजकारण होऊ देऊ नका जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेश शंभुराजे देसाई यांनी दिले आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांबाबत झालेल्या आरोपावर देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत कुठलाही कसुर ठेऊ नका असे शंभुराज देसाई म्हणाले आहेत. याबाबत बीडचे (Beed) पोलीस अधीक्षक आर. राजास्वामी यांनी जर एखादा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.