बीड जिल्ह्यात पावसाचा रौद्ररुप; अनेक गावचा संपर्क तुटला.

बीड दि.13 जून – गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy rain) कोसळत आहे. शनिवारी मुसळधार पावसामुळे बीड (Beed) जिल्ह्यातील  नदी-नाल्यांना पूर आल्याचं पहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला (lost contact) आहे. जिल्ह्यात बीड, धारुर, केज, अंबाजोगाई व वडवणीत पावसाचा जोरदार फटका बसला. आज रविवारी पहाटे पासून पुन्हा पावसाने जोरदार बँटिंग सुरु केली आहे.

(Rains in Beed district; Many villages lost contact.)

बीड जिल्ह्यातील खळवट लिंमगाव – येथील घटना भिमनाईक तांडयावर जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पावसामुळे वाहून गेला (bridge washed away) आहे. पूल वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला (lost contact) आहे. यासोबतच वडवणी सिंधफना नदी दुथडी भरून वाहू लागल्याने देवडी ते पात्रुड वाहतूक ठप्प झाली होती.

खळवट लिमगाव, चिंचवड, हरिश्चंद्र पिंपरी गावाच्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काहीकाळ संपर्क तुटला होता. शनिवार व आजच्या पावसामुळे पेरणीला वेग येणार आहे. या पावसाने आनंद व्यक्त केला जात आहे. नदी नाले भरून वाहत असल्याने तलावातील पाण्याची पातळी देखील वाढले आहे. यातच पुढील चार दिवस बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा  (Heavy rain) इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासनाच्या वतीने गावाकडच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पूल खचल्याचं समोर आलं होतं. वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथील मरीआई मंदिराजवळील पूल खचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना (accident) घडत असल्याचं वृत्त समोर येत आहेत.

धारुर तालुक्यात वादळाचा तडाखा
धारुर (Dharur) तालुक्यातील आम्ला येथे शनिवारी सांयकाळी 4 च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसात शेतकऱ्यांच्या पीकांसह फळ बागांचे मोठे नुकसान झाले. तसेच वादळामुळे घरांवरील पत्रे आकाशात उडाल्याने येथील लोकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान याची माहिती मिळताच धारूरचे (Dharur) नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी तातडीने आम्ला येथे भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहाणी करून, तलाठ्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ला व निमला परिसरातील शेतकऱ्यांच्या केळीची बाग, पपई बाग व पालेभाज्याची शेती उध्वस्त झाली. नदी नाल्या तुडूंब वाहू लागल्याने अनेक भागातील शेतजमीनीतील माती व बांध वाहुन गेले. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याचे दिसुन आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!