राजीव ‘गांधी खेल रत्न पुरस्कारा’चे आता ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ असे नामांतर.

नवी दिल्ली दि.6 अॉगस्ट – खेलरत्न पुरस्कारांबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पूरस्कार राजीव ‘गांधी खेल रत्न पुरस्कारा’चे नाव बदलून आता ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ केले आहे.

(Rajiv’s ‘Gandhi Khel Ratna Award’ has now been renamed as ‘Major Dhyanchand Khel Ratna Award’.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले की, ऑलंपिक खेळांच्या बाबतीत भारतीय खेळाडूंच्या शानदार प्रयत्नांमुळे सर्वांना गर्व वाटतो. विशेषतः हॉकीमध्ये आपल्या मुला-मुलींनी जी इच्छाशक्ती दाखवली, जिंकण्यासाठी जी मेहनत घेतली ते आताच्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

पंतप्रधान (Prime Minister) मोदी यांनी पुढे म्हटले की, देशाला गर्व प्रदान करणाऱ्या क्षणांमध्ये देशवासीयांच्या आग्रहाखातर खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंदजी (Major Dhyanchand) यांना समर्पित केले जाईल. भारतीयांच्या भावनांचा सन्मान करीत खेलरत्न पुरस्काराचे नाव यापुढे ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ करण्यात येणार आहे. मेजर ध्यानचंद भारताच्या त्या अग्रणी खेळाडूंपैकी एक होते की, ज्यांनी भारताला सन्मान आणि गर्व दिला. देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मानही त्यांच्याच नावाने असावा असं ही ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने 1991-92 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सुरू करण्यात आला होता.

‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृती द्वेषातून-नाना पाटोले
केंद्र सरकारने राजीव गांधी (Rajiv Gandhi) खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. भाजप आणि संघाने नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केला आहे, असा नाना पटोलेंनी घणाघात केलाय. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.

देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!