कोरोंना विशेष

दिलासा देणारी बातमी …. कोरोनावर आयुध हे भारतीय औषध प्रभावी.

अहमदाबाद दि.19 एप्रिल – भारतात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाचे नवीन रुग्ण विक्रमी संख्येनं आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आयुध अॅडव्हान्स (AAYUDH Advance) या भारतीय औषधाची ट्रायल अहमदाबादच्या दोन सरकारी रुग्णालयात घेण्यात आली. यामध्ये आयुध हे औषध कोरोनावर प्रभावी ठरलं आहे. ट्रायलवेळी असं आढळून आलं की, फक्त चारच दिवसात आयुध अॅडव्हान्स घेणाऱ्या रुग्णांमधील कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग वेगाने कमी झाला. विशेष म्हणजे रेमडेसिव्हिरच्या (Remdesivir) तुलनेत आयुध तीन पटीने प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. आयुध अॅडव्हान्स हे एक लिक्विड आहे ज्यात २१ प्रकारच्या वनस्पतींचा अर्क आहे.

(Reassuring news …. Indian medicine is effective on corona.)

आयुध अॅडव्हान्स (AAYUDH Advance) औषधाची ट्रायल घेतल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाले नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. ज्या कोरोना रुग्णांवर आयुध अॅडव्हान्स (AAYUDH Advance) चा उपचार करण्यात आला ते सर्व कोरोनामुक्त झाले. तसंच ताप, खोकला, श्वास घेण्यासाठी त्रास होणं यांसारखी कोरोनाची लक्षणेही कमी झाली. कंटेम्पररी क्लिनिकल ट्रायल कम्युनिकेशन या मासिकात याबाबत संशोधन प्रसिद्ध जाले आहे. त्यानुसार आयुध हे औषध कोरोनाच्या उपचारात अॅडव्हान्स स्टँडर्स ऑफ केअरच्या चाचणीत प्रभावी ठरलं आहे. हे संशोधन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, अमेरिका यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालं आहे.

आयुधची पहिली मानवी चाचणी ऑक्टोबर 2020 मध्ये एनएचएल नगर मेडिकल कॉलेज आणि SVPIMSR, एलिसब्रिज, अहमदाबादमध्ये कऱण्यात आली होती. तर दुसरी चाचणी जानेवारी 2021 मध्ये GMERS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, सोला, अहमदाबादमध्ये करण्यात आली होती. पहिल्या संशोधनावेळी सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर याची चाचणी घेतल्यानंतर ती यशस्वी ठरली होती. पहिल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये यश मिळाल्यानंतर मोठी ट्रायल करण्यात आली. यानंतर अधिक लक्षणे असलेल्या रुग्णांवर आणि ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही त्यांच्यावर चाचणी घेतली गेली. या रुग्णांना दिवसात चार वेळा आयुधचे डोस देण्यात आले. चारच दिवसात हे रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ट्रान्सलेशशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आणि भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या रेमडेसिव्हिरच्या (Remdesivir) तुलनेत आयुध तीन पटीने प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. गुजरातमध्ये तयार झालेलं आयुध अॅडव्हान्स हे एक लिक्विड आहे. ज्यामध्ये २१ प्रकारच्या वनस्पतींचा अर्क आहे. आयुर्वेदिक शास्त्रात यातील वनस्पतींचा वापर हा मानवासाठी प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा उल्लेख आहे. याचा वापर 50 हजारांहून अधिक लोकांकडून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!