पावसाचा हाहाकार… महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली; 72 जण बेपत्ता, साताऱ्यात भुस्खलन.

रायगड/सातारा दि.23 जुलै – महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती येतत असून या घटनेत 30 घरे गाडली गेल्यामुळे यामध्ये एकूण 72 नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर सातारा (Satara) जिल्ह्यातील पाटण (Patan) तालुक्यात गुंजाळी नावाच्या गावात भूस्खलन (Land sliding) झाल्याची घटना घडली आहे. तसेच वाई तालुक्यात गुरुवारी रात्री जांभळी खोर्‍यातील देवरूखवाडी वर दरड कोसळली. त्यामध्ये 20 घरांपैकी 10 घरे गाडली गेली

(The havoc of rain … 30 houses collapsed under the ground in Mahad; 72 missing, landslide in Satara.)

मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, 72 नागरिक बेपत्ता
कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड (Raigad) तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस (heavy rain) सुरु आहे. या भागात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घरांत पाणी घुसले आहे. रस्त्यावर तब्बल 10-10 फूट पाणी साचले आहे. या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक त्यांच्या घरात अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे आता आणखी एक मोठी दुर्घटना (accident) समोर आली आहे.

रायगड (Raigad) जिल्ह्यात महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोमिटवर एक दरड कोसळल्याची माहिती मिळतेय. या घटनेत तब्बल 30 घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

रायगडमध्ये मुसळधार पाऊस
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. महाड आणि माणगाव तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पाऊस बरसत असून आता पुन्हा पाऊस वाढला आहे. येथील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड शहरात अजून पाणी भरलेले आहे.

भोर-महाड मार्गावर पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्या, वरंधा घाट बंद
भोर-महाड मार्गावर अनेक ठिकणी दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आलाय. पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक प्रवाशी अडकले आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या परिसरात 249 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. बुधवारी रात्रीपासून या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडतोय. या मार्गावर अनेक ठिकाणी पडझड झालीय. याच भोर-महाड मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत भोर-महाड रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यात भुस्खलन
सातारा (Satara) जिल्ह्यातील पाटण (Patan) तालुक्यात गुंजाळी नावाच्या गावात भुस्खलन (Land sliding) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. हे अख्खंच्या अख्खं गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं (administration) दिले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले आहेत. सातारा जिल्ह्यातील गुंजाळीमध्ये अचानक जमीन खचल्याचं दिसून आलं.

दरड कोसळून 10 घरे दबली.
सातारा मधील देवरूखवाडी वर दरड कोसळली. पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, वाई तालुक्यात गुरुवारी रात्री जांभळी खोर्‍यातील देवरूखवाडी वर दरड कोसळली. त्यामध्ये 20 घरांपैकी 10 घरे गाडली गेली असून, 10 जणांना रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्यात यश आले.

पाचजण बेपत्ता असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. बचाव कार्य वेगाने सुरू असून, प्रशासन देवरूखवाडी येथे वेगवान हालचाली करीत आहे. दरम्यान, जावली तालुक्यातील रेंगडीवाडीजवळ ओढ्याला आलेल्या पुरामध्ये चौघेजण वाहून गेले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध सुरू होती. दरम्यान, कण्हेर, उरमोडी, तारळी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना नद्यांना महापूर आला असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!