नवीन वर्षात निवडले जाणार गावगाड्याचे प्रतिनिधी… ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले

मुंबई दि.११- महाराष्ट्रात गाव-खेड्यापासून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या १४२३४ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) निवडणूक (election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या १४२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat) जाहीर झाल्या असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारीला होईल आणि १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
कसा असेल निवडणूक (election) कार्यक्रम….
१५ डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील
२३ ते ३० डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी
३१ डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी (दुपारी तीन वाजेपर्यंत)
४ जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी
१५ जानेवारी मतदान
१८ जानेवारी मतमोजणी
निवडणूक चिन्ह तसंच अंतिमरीत्या निवडणूक (Election) लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ४ जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल आणि १५ जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने (State election commission) म्हटले आहे.