धारुर तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या.

किल्ले धारूर दि.6 मे – धारुर (Dharur) तालुक्यातील खोडस येथील एका 45 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे खोडस गावात हळहळ व्यक्त होत आहे.
भारत कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशात शेतकरी केंद्र बिंदू मानुन शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकरी सम्मान निधी, विमा योजना (Insurance Scheme), पिक कर्ज (Crop loan), पोखरा आदी योजना केंद्र व राज्य सरकार राबवत असतानाही दिवसागणिक अनेक शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) करत असल्याचे दिसून येतात. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्येचे प्रकार समोर येत आहेत.
धारुर तालुक्यातील खोडस येथील आशोक तुकाराम लाखे ( वय 45 वर्ष ) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. मयत आशोक लाखे यांस वडिलोपार्जित चार एक्कर शेती असून कितीही कबाड कष्ट करूनही बँकेचं व सोसायटीचे कर्ज फिटत नाही. या नैराश्यातून अशोक लाखे यांनी रविवारी (दि. 1) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शेतात प्रोफेक्स नावाचं विषारी द्रव्य प्राशन केले होते.
यानंतर त्रास होऊ लागल्याने भावकीतील एकास विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती मिळाली. त्यांनी दुचाकीवर बसवून तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. येथे अतिदक्षता विभागात लाखे यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी (दि. 4) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्याचे निधन झाले. गुरुवारी (दि.5) सकाळी खोडस येथे अंत्यविधी करण्यात आला. यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई असा परिवार आहे.
( Debt-ridden farmer commits suicide in Dharur taluka. )