घात अपघात

मनहेलावणारी बातमी … उकळत्या पाण्यात पडून 18 महिन्याच्या बालकाचा मृत्यू.

51 / 100

सिल्लोड दि.15 जुलै – उकळत्या पाण्यात पडून 18 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची मनहेलावून टाकणारी घटना सिल्लोड तालुक्यात घडली. सदर बालकावर औरंगाबाद येथील उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले.

सिल्लोड तालुक्यातील पालोद येथे लग्नानंतर घरी आलेल्या पाहुण्यांचा स्वयंपाक करताना तांदूळ उकळून बाजूला ठेवलेल्या पातेल्यातील उकळत्या पाण्यात (boiling water) 18 महिन्याचा चिमुकला दि.7 जुलै रोजी पडला होता. या मुलावर औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज शुक्रवारी (दि.15) सकाळी सदर बालकाचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या मुलाचे नाव हसनेन कलीम पठाण (वय 18 महिने) रा.पालोद असे आहे.

असा घडला अपघात…
पठाण कुटूंबियांच्या घरी लग्न झाल्यावर आलेल्या पाहुण्यांचे स्वयंपाक सुरू होते. जास्त पाहुणे असल्याने मोठ्या भांड्यात तांदूळ उकळले व तांदूळ काढून तो उकळत्या पाण्याचा भांडा बाजूला ठेवला. यावेळी नजर चुकवून चिमुकला बाळ चक्क त्या भांड्यात जाऊन बसला पाण्यात बसल्यावर त्याला बाहेर येता आले नाही. बाळाने आरडा ओरड केल्यानंतर त्याची आई व वडील धावत आले मात्र तो पर्यंत तो गंभीररित्या भाजला होता. त्याला सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आठ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या बालकाची शुक्रवारी सकाळी प्राणज्योत मावळली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे.

( Heartbreaking news… 18 month old boy dies after falling into boiling water. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!