सचिन वाझेंची ‘घरवापसी’ परमबीर सिंग यांनीच केली; निलंबन आढावा समितीचा निर्णय.

मुंबई दि.22 मार्च – परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनीच वादग्रस्त एपीआय सचिन वाझेची मुंबई पोलीस दलात ‘घरवापसी’ घडवून आणली होती. परमबीर सिंग यांच्याच अध्यक्षतेखाली निलंबन आढावा समितीने गेल्या वर्षी ५ जूनला हा निर्णय घेतला. त्यानंतर ३ दिवसांनी वाझे मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात रुजू झाले असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. सध्या राज्यासह देशाच्या राजकारणात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.

(Sachin Waze’s ‘homecoming’ was done by Parambir Singh; Decision of the Suspension Review Committee.)

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेटपणे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) याला निलंबन रद्द करुन पोलिस दलात रुजू करुन घेतल्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधकांनी शिवसेनेच्या आग्रहावरून वाझेला खात्यात घेतल्याचा आरोप केला होता. प्रत्यक्षात कागदावर मात्र तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अधिकारात हा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम(४),(५),(क)च्या अनुषंगाने त्याला सेवेत घेण्यात आले होते.

अँटेलियाच्या परिसरात मिळालेल्या स्फोटक कारच्या गुन्ह्यात एपीआय सचिन वाझेला १३ मार्चला मध्यरात्री एनआयएने अटक केली. त्यानंतर राज्यात सातत्याने ‘स्फोट’ घडत राहिले. देशमुखांनी आरोप फेटाळून लावताना वाझे व एसएस ब्रँचचे एसीपी पाटील हे परमबीर यांच्याशी पूर्वीपासून संबंधित असल्याचा दावा केला. त्यामुळे वाझेला पुन्हा सेवेत घेण्यामागील माहिती घेतली असता त्यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. ख्वाजा युनूस प्रकरणी वाझेला ३ मार्च २००४ रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्याच वर्षी १२ मार्चला त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १६ वर्षे खात्याबाहेर होता. ५ जून २०२० रोजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली निलंबन आढावा समितीच्या बैठकीत त्याला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाला.

निलंबन समितीच्या आढावा बैठकीत आयुक्ताशिवाय सहआयुक्त (प्रशासन), सशस्त्र दलाचे अप्पर आयुक्त, एसीबीचे अप्पर आयुक्त व मंत्रालय सुरक्षा उपायुक्त उपस्थित होते. यावेळी ११३ प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी १८ जणांचे निलंबन मागे घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली. यानंतर सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी घडवलेल्या अँटेलिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे मुंबई पोलिस दलावर (Mumbai Police) थेट बोट उचलण्यात आले होते.

दरम्यान, आज दिवसभर या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना क्लिन चिट देत परमबीर सिंग यांची माहिती खोटी असुन राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. यावर विरोधी पक्षाने पुन्हा रणकंदन सुरु केले असून परमबीर सिंग यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीत हायकमांडची भेट घेतली. संसदेतही या प्रकरणाचे पडसाद दिसुन आले.

आले होते. त्यानंतर तब्बल १६ वर्षे खात्याबाहेर होता. ५ जून २०२० रोजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली निलंबन आढावा समितीच्या बैठकीत त्याला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाला.

निलंबन समितीच्या आढावा बैठकीत आयुक्ताशिवाय सहआयुक्त (प्रशासन), सशस्त्र दलाचे अप्पर आयुक्त, एसीबीचे अप्पर आयुक्त व मंत्रालय सुरक्षा उपायुक्त उपस्थित होते. यावेळी ११३ प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी १८ जणांचे निलंबन मागे घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली. यानंतर सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी घडवलेल्या अँटेलिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे मुंबई पोलिस दलावर (Mumbai Police) थेट बोट उचलण्यात आले होते.

दरम्यान, आज दिवसभर या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना क्लिन चिट देत परमबीर सिंग यांची माहिती खोटी असुन राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. यावर विरोधी पक्षाने पुन्हा रणकंदन सुरु केले असून परमबीर सिंग यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीत हायकमांडची भेट घेतली. संसदेतही या प्रकरणाचे पडसाद दिसुन आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!