शाळा बंदच… अवघ्या काही तासात निर्णय मागे.

मुंबई दि.6 जुलै – कोविडमुक्त (Corona free) क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संमतीने आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय सोमवारी शिक्षण विभागाकडून (School education department) जारी करण्यात आला, मात्र अवघ्या काही तासांतच या निर्णयाबाबत विभागाने यु टर्न घेतला आहे. निर्णयात काही तांत्रिक त्रुटी असून त्यातील दुरुस्तीच्या कारणावरून तो शासन निर्णय (Government Decision) संकेतस्थळावरून हटविण्यात आला आहे.
(School closed … decision back in just a few hours.)
शाळा बंद असल्यामुळे व मुलं घरी राहण्याचे अनेक दुष्परिणाम लक्षात आले आहेत. त्यात सामाजिक (socialzation) कौशल्यांचे नुकसान , मोबाईल (mobile) व इंटरनेटचा (Internet) गैरवापर व शिक्षणापासून वंचित राहणे त्यामुळे मानसिक तणावामुळे काही मुलांनी केलेली आत्महत्या, घरगुती (domestic Wolence) चे वाढते प्रमाण, बाल – विवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण , मुलींचे घर – शेती कामात ठेवणे आशा अनेक गोष्टींमुळे मोठया प्रमाणावर सामाजिक नुकसान लक्षात आले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविड – मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सोमवारी याबाबत शिक्षण विभागाने कोरोनामुक्त गावात शाळा सुरु करण्याचा निर्णयही जाहीर करत मार्गदर्शक सुचना जारी केल्या होत्या. यामुळे पालकांत समाधान व्यक्त झाले होते.
दरम्यान, तो शासन निर्णय रात्रीतून स्थगित करण्यात आला. आवश्यक त्या दुरुस्ती करून तो पुन्हा जारी करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील (School education department) अधिकारी देत असले तरी शिक्षण विभागातील असमन्वय आणि घाई गडबडीत घेतलेले निर्णय यावरून समोर येत असल्याच्या चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगू लागल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि शाळांच्या मदतीने कोविडमुक्त (Corona free) क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी काल सोमवार दि. 5 जुलै रोजी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना (Guidelines)जारी करण्यात आल्या आहेत. मात्र, रात्री उशिरा संकेतस्थळावरून तो हटविण्यात आल्याने त्याच्या अमलबजावणीबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत.
दरम्यान शाळा सुरू करण्याआधी स्थानिक पातळीवरील अहवाल मागवून घेण्यात येणार आहे आणि जिल्ह्यातील आढावा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पालकांची आणि मुख्याध्यापकांची संमती आवश्यक असणार आहे, त्यामुळे या तांत्रिक बाबी ही शासन निर्णयात नमूद करण्यात येतील अशी माहिती मिळत आहे.
या दुरुस्त्यानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून नवीन शासन निर्णय जारी करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. काल रात्री हटविण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती अद्याप शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना नसल्याने गोंधळाचे वातावरण होऊन संभ्रम निर्माण झाला आहे.