शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंदच; आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

मुंबईः दि.२०(प्रतिनिधी) राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबर पासून सुरु होणार असल्या तरी मुंबईतील Mumbai शाळा School मात्र वाढत्या कोरोना corona रुग्ण संख्येमुळे खबरदारी म्हणून ३१ डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई Mumbai महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल Iqbal Chahal यांनी घेतला आहे.
राज्यात सर्वत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा School सुरु करण्याची तयारी सुरु असताना मुंबई Mumbai मध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशात दिल्लीमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेनंतर गुजरातमध्येही अहमदाबादेत पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. याच काळात महाराष्ट्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा School येत्या सोमवार पासुन सुरु होत आहेत. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेवूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा अशा सुचना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी दिल्या आहेत. मुंबईत ३१ डिसेंबर पर्यंत शाळा सुरु न करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त इक्बाल चहल Iqbal Chahal यांनी घेतला आहे. लवकरच याबाबतीचे आदेश सर्व शाळांना पाठवण्यात येणार आहेत.