उद्यापासून शाळा सुरु; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय.

मुंबई दि.14 जून – राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने (education department) दिली. मात्र राज्यातील शाळा ऑनलाईन (Online) माध्यमातूनच सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत मात्र अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
(School starts tomorrow; Big decision of school education department.)
15 जूनपासून ऑनलाईन (Online) आणि इतर शक्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचण्याच्या सूचना आम्ही देणार आहोत. येत्या दोन दिवसांत यासंदर्भात पत्रक जारी करण्यात येईल. शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे, अशी माहिती शालेय शिक्षण संचालक (education department) दत्तात्रय जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये याचीही खबरदारी घेण्यास सांगण्यात येईल, असं जगताप यांनी सांगितलं. सरसकट सगळीकडे एकाचवेळी शाळा सुरू करता येणार नाहीत. आपल्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असंही जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आजही अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडॉऊन (lockdown) लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
मात्र केवळ शिक्षकांनाच शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाणार नाही. शिक्षक शाळेतूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्याचे काम करणार आहेत. यावरून शाळांमधील वर्गखोल्या बंद अन् स्टाफरूम मात्र सुरू असे चित्र नव्या सत्रात पाहायला मिळणार आहे.
मार्गदर्शक (guidelines) सूचना नाहीत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संस्थांना दिलेत. मात्र, शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याबाबत कोणतीही स्पष्ट नसल्यानं संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात आणि त्याचं नियोजन कसे असेल याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शक (guidelines) सूचना दिलेल्या नाहीत. यामुळेच प्रश्न निर्माण झाला आहे.