सामाजिक कार्यकर्त्यां व पोलिसांना पाहताच वऱ्हाडीनी ठोकली धूम… धारुर तालुक्यातील घटना

किल्लेधारूर दि.१९(वार्ताहर) धारुर तालुक्यातील कारी येथील मुलासोबत माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील एका अल्पवयीन मुलीचे काल गुरुवार दि. १८ रोजी विवाह लावला जाणार होता. मात्र माजलगाव (Majalgoan) येथील सामाजिक कार्यकर्त्या व दिंद्रुड पोलिसांच्या सतर्कतेने सदरील बालविवाह (Child marriage) रोखण्यात आला. यावेळी पोलिस (Police) आल्याचे दिसताच विवाह स्थळावरून वराडी मंडळीनी धुम ठोकल्याची घटना घडली.
(Seeing the social workers and the police, Varhadi hit Dhoom … Incident in Dharur taluka)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धारुर (Dharur) तालुक्यातील मुला सोबत माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावातील १६ वर्षीय मुलीचा विवाह गुरुवारी कारी येथे आयोजित करण्यात आला होता. हळदीचा मांडव व विवाह समयीचे सर्व सोपस्कार पुर्ण करण्यासाठी दोन्ही परिवारातील मंडळी कामाला लागली. मात्र माजलगाव (Majalgoan) येथील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल व दिंद्रुड पोलिस स्टेशन चे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश विदाटे विवाह स्थळावर पोहोचले. यामुळे उपस्थित वराडी मंडळीची धावपळ झाली. पोलिसांना पाहताच वऱ्हाडी मंडळीनी काढता पाय घेतला.
कुटूंबियांनी विवाह समारंभ नसुन साखरपुडा कार्यक्रम असल्याचा बनाव रचला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे वराडींनी काढता पाय घेत विवाह सोहळा रद्द केला. या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांचे सतर्कतेमुळे व दिंद्रुड पोलीस तात्काळ या विवाह ठिकाणी पोहचल्याने हा विवाह रोखण्यात यश आले. दोन्ही परिवाराला दिंद्रुड पोलिस स्टेशनचे प्रभारी निलेश विदाटे यांनी समज दिली असुन बालविवाहाचे होणारे मुलीवरील वाईट परिणामाबाबत समुपदेशन केले. सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल व दिंद्रुड पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बालविवाह (Child marriage) रोखला गेला, या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्यां निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल यांनी प्रतिक्रिया दिली. लहान वयात लग्न केले गेल्यामुळे मुलीचे शिक्षण थांबते, तिच्यावर अकाली मातृत्व लादले जाते, हसत्या खेळत्या वयात अशा कोवळ्या पोरींना बाईपण येते. बालविवाहामुळे मुलींच्या विकासाच्या सर्व संधी हिरावुन घेतल्या जातात यामुळे असे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. मला हा विवाह संपन्न होण्यासाठी हिवरा येथील कार्यकर्त्यांनी अनेक अमिषे दाखवली मात्र मी त्यांना बळी न पडता माजलगाव प्रशासनाच्या मदतीने बालविवाह थांबवला याचे मला मनस्वी समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.