बीड जिल्ह्यात खळबळ… नरेगा गैरव्यवहार प्रकरणी 500 सरपंच व ग्रामसेवकांना नोटीसा; धारुरचे किती?

बीड दि.11 अॉगस्ट – नरेगामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत बीडच्या जिल्हाधिकार्‍यांची बदली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या (High court) औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. या प्रकरणी आता महसूल विभागाकडून (Department of Revenue) प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली असून बीड (Beed) जिल्ह्यातील जवळजवळ 500 सरपंच आणि ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात धारुर तालुक्यातील 75 ग्रामसेवक व 14 सरपंचाचा समावेश आहे.

(Sensation in Beed district … Notice to 500 sarpanches and gram sevaks in NREGA malpractice case; How much is Dharur?)

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये 2010 ते 2020 या दहा वर्षात कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांना त्या त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात संबंधित ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरप्रकाराचा उल्लेख असून त्यावर तात्काळ खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायत (Gram Panchayat) अंतर्गत झालेल्या नरेगाच्या (NREGA) कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासोबतच ज्या कामाच्या ऑडिटनंतर काम नियमबाह्य झाले असल्याचे पुढे आले होते. त्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच (Sarpanch) आणि ग्रामसेवक (Gramsevak) तसेच रोजगार सेवकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस (Show cause notice) दिल्या आहेत यानंतर या नोटिशीला तीन दिवसात उत्तर मागितले आहेत.

नरेगाच्या कामामध्ये घोटाळ्याच्या तक्रारी होणे ही काही नवी बाब नाही मात्र या संदर्भामध्ये प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही म्हणूनच अखेर राजकुमार देशमुख यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. विशेष म्हणजे याच कामात तपासणीत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची बदली करा असा आदेश काढला होता.

बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात म्हणजे गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, धारूर (Dharur), माजलगाव, अंबाजोगाई, परळी आणि वडवणी या अकरा ही तालुक्यातील पंचायत समिती मार्फत या ग्रामपंचायत सरपंच ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामसेवकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याची की पहिलीच वेळ असावी.

धारुर तालुक्यात किती?
धारुर तालुक्यातील 75 ग्रामसेवक व 14 सरपंचांना या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील कोळपिंपरी, रुइधारुर, तेलगाव, उमरेवाडी, पिंपरवाडा, सुरनरवाडी, कासारी, गांजपूर, मुंगी, चिंचपूर या गावात नरेगाची ठपका ठेवलेली कामे करण्यात आलेली आहेत. यागावांसह इतर काही गावांत संबंध असलेल्या तब्बल 75 ग्रामसेवकांना तसेच कोळपिंपरीच्या तीन तर रुईधारुर व उमरेवाडीच्या प्रत्येकी दोन सरपंचाचा यात समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!