अंजनडोह मध्ये बिबट्याने घेतला महिलेचा बळी…आणखी किती बळींची प्रतिक्षा

करमाळाः दि.६- बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुक्यात तिघांचा बळी घेतल्यानंतर नरभक्षक बिबट्याचा (Leopard) थरार आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्यात पहावयास मिळत आहे. काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील एका महिलेचे शिर धडावेगळे करुन बिबट्याने (Leopard) करमाळा (Karmala) तालुक्यातील दुसरा बळी घेतला आहे. आत्तापर्यंत बिबट्याने पाच जनांचा बळी घेतला असून प्रशासन आणखी किती बळी पडण्याच्या प्रतिक्षेत आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुक्यात दहा दिवस धुमाकूळ घालून तीन बळी घेत अनेकांना जखमी करणाऱ्या बिबट्याने (Leopard) करमाळा (Karmala) तालुक्यात स्थलांतर केले आहे. बिबट्या दिवसभरातून शंभर कि.मी. चा प्रवास करु शकतो. आष्टी ते करमाळा हे अंतर ४० कि.मी.चे आहे म्हणून आष्टी नरभक्षक बिबट्याने करमाळाकडे धूम ठोकल्याचा अंदाज वन विभागाकडून (Forest Department) व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपुर्वी करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी येथे महिलेला ठार केल्यानंतर संध्याकाळी अंजनडोह येथील एका महिलेचा बळी बिबट्याने घेतला. करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथे शेतात लिंब वेचण्यासाठी गेलेल्या जयश्री शिंदे या २५ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करुन शिर धडावेगळे करुन ठार केल्याची घटना सात च्या सुमारास घडली. आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने आता करमाळा तालुक्यात थरार सुरु केला असुन नरभक्षक झालेल्या या बिबट्यास ठार करण्याची परवानगी वन विभागाकडून (Forest Department) मागण्यात आली आहे. यात मात्र आणखी किती बळी जाणार असा प्रश्न उपस्थित होत असून नागरीकांनीच आता स्व रक्षणार्थ शस्त्र हाती घेण्याची वेळ आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!