धक्कादायक … पुरोगामी महाराष्ट्रात माणूसकीला काळीमा; नरबळी व भानामतीच्या प्रकाराने खळबळ.

कोल्हापूर/चंद्रपूर दि.23 अॉगस्ट – पुरोगामी महाराष्ट्रात कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अपत्य प्राप्तीसाठी विकृत मित्रानेच आपल्या डॉक्टर मित्राच्या अवघ्या सात वर्षीय मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला आहे. यापाठोपाठ जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केल्याची घटना विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात जिवतीपासून 12 किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात घडली आहे.

(Shocking … Disgrace to humanity in progressive Maharashtra; Sensation of human sacrifice and Bhanamati type.)

सात वर्षाच्या वरदचा अपत्यप्राप्तीसाठी नरबळी…
भयंकर आणि अंगावर शहारे आणणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रकमध्ये घडली. वरद रवींद्र पाटील (वय 7, रा. सोनाळी, ता. कागल) असे या निष्पाप मुलाचे नाव आहे. या प्रकारानंतर सोनाळी गावात संतापाची लाट उसळली आहे. वरदच्या वडिलांच्या मित्रानेच अपत्यप्राप्तीसाठी बळी दिल्याचा संशय आहे. पण पोलिसांनी खुनाचे (Murder) कारण स्पष्ट केलेले नाही. या घटनेनंतर सोनाळीमध्ये (ता. कागल) प्रचंड पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) शैलेश बलकवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, संशयित आरोपी मारुती तुकाराम वैद्य याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

भानामती केल्याच्या संशयावरुन मारहाण…
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात जिवतीपासून 12 किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी दुसरी घटना शनिवारी घडली. जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण (Violent beating) केली. या घटनेत 7 जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. त्यामुळे चोवीस तास उलटूनही या गंभीर प्रकाराची कुठेही वाच्यता झालेली नाही. किती लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, कुणाला अटक करण्यात आली का, याबाबत काहीही माहिती देण्यास स्थानिक पोलीस नकार देत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी आल्या आणि त्यांनी दलित समाजातील वयाने ज्येष्ठ आठ-दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी भानामती केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात खांबांना बांधून बेदम मारहाण केली. वृद्ध, महिलांनाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक मूकपणे पाहात बसले होते. भीतीने कुणीही मध्ये पडले नाही. यात 7 जण जखमी झाले. त्यांना जिवती ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर दोघांना घरी पाठवण्यात आले, तर पाच गंभीर जखमींना चंद्रपूरला हलविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!