धक्कादायक … बीड जिल्ह्यात वाळू उपसा केलेल्या खड्ड्यात बुडून चार बालकांचा मृत्यू.

गेवराई दि. 6 फेब्रुवारी – बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात वाळू उपसा केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्याची घटना आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे बीड (Beed) जिल्हा हादरला असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील लोक आक्रमक झाले आहेत.
(Shocking … Four children drown in Beed district.)

गेवराई (Gevrai) तालुक्यातील वाळू उपसा (Sand extraction) सर्व परिचित झाला आहे. परंतु आता हे लोकांच्या जिवावर उठल्याचे दिसत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून आज वाळू उपसा केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

या घटनेने बीड जिल्हा हादरला असून, ग्रामस्थांनी कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. या घटनेनंतर शहाजहानपूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेवराई तालुक्यातील सिंदफना नदीतून माफिया वाळूचा बेसुमार उपसा करत आहेत ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. याला प्रशासनाचे कातडी बचाव धोरण कारणीभूत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. हा गोरखधंदा पैसे कमवण्यापुरता होता, तोपर्यंत ठिक. पण हा धंदा आपा लोकांच्या जिवावर उठल्याचे दिसत आहे.

मागे काही दिवसांपूर्वी एका मानसाला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले होते. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावेळी हे प्रकरण जिल्ह्यात खुप गाजलं आहे. आजतर झोप उडवणारी घटना उघडकीस आली आहे.

गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला येथील बबलु गुणाजी वक्ते (वय 13), गणेश बाबुराव इनकर (वय 13), आकाश राम सोनवणे (वय 11), अमोल संजय कोळेकर (वय 12) या बालकांचा वाळू उत्खननामुळे झालेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर तरी प्रशासन या बाबतीत काही पावलं उचलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!