अनेक महिन्या नंतर मठ गल्लीतील गटारी मोकळ्या

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर) येथील डेंग्यूच्या साथीमुळे चर्चेत आलेल्या मठ गल्लीतील तूंबलेल्या गटारीनी आज मोकळा श्वास घेतल्याचे दिसुन आले. अनेक महिन्यानंतर उपसा झाल्यामुळे गाळाचे अक्षरशः डिग दिसत होते.
गेल्या आठवड्यात शहरातील मठ गल्ली डेंग्यूच्या रुग्णांमुळे जिल्हाभर चर्चेत होती. याभागातील अस्वस्थ नाल्या, गटारी व साचलेले गटारीचे पाणी सोशल मेडियावर चर्चेचा विषय बनली होती. अस्वस्थता बाबतीत याभागातील कार्यकर्त्यांनी नगर परिषदेकडे तक्रारी करत आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. मुख्याधिकारी सुहास हजारे यांनी जातीने लक्ष देवून याभागातील तुंबलेल्या गटारी उपसण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी अनेक दिवसांपासून तुंबलेल्या
गटारीतून साचलेल्या गाळाचे अक्षरशः डिग निघाल्याचे दिसुन आले. याभागातील स्वच्छतेकडे नगर परिषदेचे दुर्लक्षच होते यावरुन सिध्द होत आहे.