कोरोंना विशेष

आज पासून कडक लॉकडाऊन; हे आहेत नवीन नियम.

मुंबई दि.22 एप्रिल – आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) जनतेला संबोधन करतील अशी अपेक्षा होती. मात्र, नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री आज घटनास्थळी भेट देतील आणि त्यानंतर जनतेला संबोधन करतील, अशी माहिती मिळाली आहे. राज्यात आज 22 एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून ब्रेक दि चेनची (Break The Chain) मधील नवे निर्बंध लागू होणार आहेत. आधीच्या नियमांहून हे नियम अधिक कडक असणार आहेत.

(Strict lockdown from today; These are the new rules.)

परिस्थिती ओळखून सध्यातरी कडक निर्बंधांचे आदेश दिले आहेत. लॉकडाउन (lockdown) करणं गरजेचं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) लवकरच याबाबतची माहिती देतील. जिल्हाबंदी होणार नाही, पण विनाकारण फिरणाऱ्यांना रोखलं जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

ब्रेक दि चेनची (Break The Chain) अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे असतील – (दृष्टीक्षेपात)

-लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड
लग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॉलमध्ये 2 तास कार्यक्रम

-आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी
मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने
-सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने सुरु
खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु

-लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश. आयकार्ड तपासून तिकिट मिळेल
-खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच

-खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी
सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे.

-अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.

-लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे.

-जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

-अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार
यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकंच नव्हे, तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावे लागणार आहेत.
या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

नियमावलीत नेमके बदल कोणते?
1. आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन
2. ‘1 मे’च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन
3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद

4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
5. राज्यात जिल्हा बंदी लागू
6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी

8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
9. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार
10. एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार
11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा

12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड
13. सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती
14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार

15. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी
16. लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार
17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार

18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक
19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार
20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!