BEED24

Suicide… कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या ; धारुर तालुक्यातील घटना.

किल्ले धारूर दि.26 नोव्हेंबर – धारूर Dharur तालुक्यातील आंबेवडगाव येथे शेतकरी भिमराव काशिनाथ नायकोडे यांनी दि. 23 रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून तननाशक औषध घेऊन आत्महत्या Suicide केल्याची घटना घडली.

भारतीय स्टेट बँक SBI , धारूर, आधार मल्टीस्टेट बँक तेलगाव ता. धारुर Dharur या बँकेचे कर्ज व सततची नापिकी आणि या वर्षीचा दुष्काळामुळे बँकेचे घेतलेले कर्ज फिटत नाही या विवंचनेतून भीमराव नायकोडे हे सतत नैराश्यात होते. या नैराश्यातून त्यांनी दि. 23 रोजी शेतामध्ये जाऊन तननाशक कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या suicide केली. त्यांना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय दवाखाना अंबेजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे अंबेवडगाव गावांत हळहळ व्यक्त केली जात आहे .

Exit mobile version