राज्यातील शाळांबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय…

मुंबई : दि.२६ फेब्रुवारी – नववर्षात जानेवारी महिन्यात राज्यातील कोरोना (corona) रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. यामुळे अनेक भागांतील निर्बंध उठवण्यात आली व काही अटी शर्तीसह शाळाही सुरू करण्यात आल्या. मात्र, आता पुन्हा कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागल्याने बहुतांश जिल्ह्यात शाळांना कुलूप लावलं जात आहे. अशातच आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आवश्यकता वाटल्यास शाळा बंद ठेवाव्यात, असे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले आहे.
(Education Minister Varsha Gaikwad’s big decision regarding schools in the state.)
राज्यातील बहुतांश शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह (Corona Positive) आल्या आहेत. अशात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे, ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे, तिथे आवश्यक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत, असं वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून सांगितलं आहे.
राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर काही जिल्ह्यांमधील शाळांत विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. यामुळे समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग यांसह विविध विभागांशी चर्चा करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे, असंही गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, लातूर येथील एका शाळेतील ४५, वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगाव येथील निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहातील २२९ विद्यार्थी बुधवारी कोरोनाबाधित (Corona Positive) आढळले तर सोलापूर येथील शाळेत गुरुवारी ४५ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले होते. आता या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.