माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न- पंकजाताई मुंडे

बीड-दि.२५- माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला गेला, पण मला आत जायचं माहितीये, तसंच बाहेर येणंही माहितीये, असं म्हणत आपल्याविरोधात राजकारण सुरू आहे, मात्र मी खंबीर आहे, असं पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर म्हटलं.

पंकजाताई बाहेर येत नाही, राजकारण करत नाही असा अपप्रचार झाला. पण, कोरोना असल्यामुळे सभा घेऊ नका, अशी विनंती अधिकाऱ्यांनी मला केली होती. पण, मी आता बाहेर आलीये,” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपलं राजकारण संपल नाही, कोरोना काळात आपण नियमांचं पालन करत असल्याचं म्हटलं. या मेळाव्याला तु्म्ही गर्दी केली आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त गर्दी करू. एकदा आपल्याला शिवाजी पार्क भरवायचं आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.

ठळक मुद्दे

आज (25 ऑक्टोबर) सकाळीच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावर जाऊन दर्शन घेतलं.

पंकजा मुंडे सावरगावात पोहोचल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या हस्ते भगवान बाबांची आरती झाली.

सावरगावच्या भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे ऑनलाईन मेळावा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या 10 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचं पंकजा मुंडे यांनी स्वागत केलं. मात्र, ही मदत पुरेशी नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

“10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज पुरेसं नाही. त्यामुळे त्यात वाढ करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, अशी विनंती मी त्यांना करणार आहे,” असं पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी म्हटलं.

‘…तर फडात बसलेली माणसंही बाहेर काढता येतात’

कोरोनाकाळात माझ्या प्रयत्नांमुळे ऊसतोड कामगारांना घरी सुखरूप पाठवण्यात आलं. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि त्यांनी ते ऐकलं, असं पंकजा यांनी म्हटलं.

पंकजा मुंडे यांनी म्हटलं, “आता ऊसतोड कामगारांसमोर निर्माण झालेले प्रश्न मी सरकारसमोर, शरद पवारांसमोर मांडणार आहे. माझा ऊसतोड कामगार लाचारी पत्करणार नाही. लोकांचे कारखाने सुरू होऊन चालले असून आम्ही आता गप्प बसणार नाही. ”

“ऊसतोड कामगारांबद्दल जो निर्णय घ्यायचाय, तो 27 तारखेला होणाऱ्या बैठकीत घ्यावा. नाहीतर फडात बसलेली माणसंही बाहेर काढता येतात,” असा इशारा पंकजा यांनी म्हटलं

ऊसतोड कामगारांचे निर्णय हे मुंबईत बसून होत नाहीत. मग काय धाब्यावर बसून निर्णय घ्यायचे? ऊसतोड कामगारांचा नेता मुंबईत किंवा दिल्लीत बसलं तर काय बिघडतं?”

पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली आहे. त्याबद्दल बोलताना पंकजा यांनी म्हटलं की, मला जे पद मिळालं आहे ते माझ्या प्रवासातील मला मिळालेली संधी आहे. ही संधी तुमच्या भल्यासाठी आहे. महाराष्ट्र सोडून निघून चालले असं काही नाहीये. बीड, महाराष्ट्र माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी इथंच राहणार आहे.

#Pankaja Munde

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!