राज्याला सोमवारी दिलासा…. कोरोना आकडेवारीत काही प्रमाणात घट.

मुंबई दि.2 मार्च- राज्यात गेल्या पाच दिवस दरदिवशी आठ हजारावर रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. यातच सोमवारची कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक आली आहे. सोमवारी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. काल रात्री आलेल्या माहितीनूसार 6 हजार असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजारहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
(Consolation to the state on Monday …. some reduction in Corona figures.)
राज्यात सोमवारी 6 हजार 397 कोरोनाबाधित (Corona Positive) आढळून आले आहेत. तर 30 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 5 हजार 754 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 20 लाख 30 हजार 458 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण 9.3.94 टक्के एवढे आहे. तर राज्यातील मृत्यूदर 2.41 टक्के आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आजपर्यंत एकूण 20,30,458 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.94% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,63,46,358 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 21,61,467 (13.22 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. सध्या राज्यात 3,43,947 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,482३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. सध्या राज्यात 77 हजार 618 रुग्ण ॲक्टीव (Active) आहेत.
दरम्यान, काल महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून यात पहिल्या दिवशी 32 कर्मचारी कोरोनाबाधित आढळले होते. मराठवाडा व विदर्भातील कोरोना मीटर चढता असल्याने अनेक ठिकाणी सुपर स्प्रेडस शोध मोहिम सुरु आहे. बीड जिल्ह्यातही व्यापाऱ्यांसाठी कोरोना (corona) चाचणी सुरु करण्यात आली आहे. मात्र यास व्यापाऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. व्यापाऱ्यांनी या तपासणीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. काल बीड जिल्ह्यात 53 कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.