माझं गाव

धारूर घाटात ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे 100 वारकऱ्यांचे प्राण वाचले.

50 / 100

किल्लेधारूर दि.14 – धारूर घाटात ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे 100 वारकऱ्यांचे प्राण वाचल्याची घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघात टळल्यामुळे मोठ्या दुर्घटनेतून साक्षात पांडूरंगाने वाचवल्याची प्रतिक्रिया वारकऱ्यांनी व्यक्त केली.

याबाबत अधिक वृत्त असे की, पंढरपूरहुन परभणी जिल्ह्यातील पोखर्णीकडे 100 वारकरी घेऊन जाणाऱ्या ट्रक क्र एम एच 11 एम 4019 जात होता. रात्री नऊच्या सुमारास धारुर घाटात आले असता या ट्रकचे ब्रेक फेल झाले. मात्र चालकाने हुषारी दाखवत अवघड घाटातील संरक्षक कठड्याला घासून कसाबसा ट्रक खोल दरीत पडण्यापासून वाचवला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. घटनेची माहिती धारूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांना मिळताच तात्काळ मदतकार्य करण्यात आले.

धारूर शहरातून जाणारा 548 सी राष्ट्रीय महामार्गावर (National Highway 548 C) अडीच किमीचा अरुंद व अवघड घाट लागतो. या घाटावर आजवर अनेक अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. सतत घाट रुंदीकरणाचा प्रश्नावर आंदोलन करुनही अद्याप घाट रुंदीकरण प्रश्न प्रलंबित आहे. रात्रीच्या प्रकारामुळे पुन्हा हा प्रश्न चर्चेत आला आहे. रात्री ट्रक चालकाच्या तत्परतेने सुदैवाने अपघात टळला. या घटनेची माहिती कळताच धारूर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष सिरसट, बाळू सिरसट, सादेक इनामदार, ऋषीकेश फुके यांनी यावेळी मदत केली. वारकऱ्यांसाठी संतोष सिरसट व सादेक ईनामदार यांनी स्वखर्चातून वारकऱ्यांसाठी वाहनाची व्यवस्था करून त्यांना त्यांचे गावी रवाना केले. यावेळी पोलीस प्रशासनाचे पी.एस.आय भालेराव, एएसआय गोविंद बाष्टे, निंगुळे, बहीरवाल,जाधव उपस्थित होते.

( In Dharur Ghat, 100 people lost their lives due to the accident of the truck driver. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!