औरंगाबाद मधील पर्यटनस्थळे आठ महिन्यानंतर खुली

औरंगाबाद दि.११- आठ महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबाद (Aurangabad) मधील पर्यटनस्थळे (tourist place) काल दि.१० डिसेंबर रोजी खुली करण्यात आली असुन पहिल्या दिवशी तुरळक पर्यटकांनी येथील दख्खनचा ताज म्हणून ओळख असलेल्या बिबी का मकबरा (Bibi ka maqbara) या पर्यटनस्थळास भेट दिली.
राज्यातील पर्यटनस्थळे मार्च पासुन बंद आहेत. राज्यात आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले पर्यटनस्थळ (tourist place) औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. पर्यटन राजधानी म्हणूनही औरंगाबादची ओळख आहे. जगप्रसिध्द अजिंठा (Ajanta), वेरुळ (Yelora) लेण्या, बिबी का मकबरा (Bibi ka maqbara) सारख्या पर्यटनस्थळास दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक भेट देत असतात. मात्र गेली आठ महिने कोविड-१९ (covid-19) प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व पर्यटनस्थळ बंद होती. लोकांच्या मागणीनंतर कोविड-१९ (covid-19) चे नियम पाळत काल दि.१० रोजी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पर्यटनस्थळ (tourist place) सुरु करण्यात आली. सर्वप्रथम औरंगाबाद (Aurangabad) येथील बिबी का मकबरा (Bibi ka maqbara) खुला करण्यात आला. यास पहिल्याच दिवशी अनेकांनी भेट दिली. आज अजिंठा व वेरुळच्या लेणी उघडण्यात येणार आहेत. उद्यापासून पर्यटक लेण्या पाहण्यास भेट देवू शकतील. पर्यटकासाठी दोन सत्रात पर्यटनस्थळ उघडण्यात येणार आहेत. सकाळच्या सत्रात एक हजार तर दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटक असे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अॉनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तिकीट खिडकी मात्र बंदच राहणार आहे. पर्यटन विभागाकडून पर्यटकांसाठी थर्मल गन, सॕनिटायझर, मास्क असे कोविड नियम पाळली जाणार आहेत.