राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ नावांच्या समोर ही असेल अडचण;

मुंबईः दि.७- काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagatsing Koshyari यांच्याकडे कॕबिनेट कडून १२ नावांची यादी सादर करण्यात आली. या बारा जनांच्या यादीत अपवाद वगळता बहुतेक जण राजकीय आहेत. हा सरळ सरळ घटनेतील अनुच्छेद 171 (5) मधील तरतुदींचा भंग आहे. त्यामुळे राज्यपाल महोदयांनी ही नावं स्वीकारू नयेत अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख S.M. Deshmukh यांनी केली आहे. तर सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया Anjali Damaniya यांनीही यापूर्वी राज्यपालांची भेट घेवून यासंबंधी निवेदन केले आहे.
घटनाकारांनी जी 12 जागांची व्यवस्था केली आहे त्यामागचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेतून जी मंडळी परिषदेवर निवडून येऊ शकत नाही पण ज्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा समाजहितासाठी उपयोग होणे गरजेचे असते अशा विविध क्षेत्रातील मंडळींची वर्णी परिषदेवर लागली पाहिजे अशी घटनाकारांनी अपेक्षा होती. त्यासाठी ही तरतूद करतांना घटनाकारांनी राज्यपाल नियुक्त व्यक्ती कोणत्या क्षेत्रातल्या असाव्यात याचंही मार्गदर्शन केलेलं आहे. कला, साहित्य, विज्ञान, सहकार आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील व्यक्तींना राज्यपालांनी परिषदेवर घ्यावं असं घटनेत स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. मात्र विधान परिषद अस्तित्वात आल्यापासून घटनेतील या तरतुदीची सातत्यानं पायमल्ली होत आली आहे. काही अपवाद वगळता बहुतेक वेळा राजकीय बगलबच्चयांचीच राज्यपाल कोट्यातून परिषदेवर सोय केली गेलेली आहे. या वेळी देखील हेच घडत आहे. कॅबिनेटनं जी बारा नावं राज्यपालांकडे पाठविली आहेत त्यात अपवाद वगळता बहुतेक जण राजकीय आहेत. हा सरळ सरळ घटनेतील य अनुच्छेद 171 (5) मधील तरतुदींचा भंग असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे. अंजली दमानिया Anjali Damaniya पाठोपाठ एस.एम. देशमुख S.m. Deshmukh यांनीही या नावावर विरोध दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagatsing Koshyari काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.
यादीत यांचा आहे समावेश
राष्ट्रवादी NCP
एकनाथ खडसे
राजू शेट्टी
यशपाल भिंगे
आनंद शिंदे
काँग्रेस Congress
रजनी पाटील
सचिन सावंत
मुझफ्फर हुसेन
अनिरुद्ध वनकर
शिवसेनेकडून Shivsena
उर्मिला मातोंडकर
नितीन बानगुडे पाटील
विजय करंजकर
चंद्रकांत रघुवंशी