विजेच्या तारेला चिटकून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू ; बीड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना.

गेवराई दि.3 सप्टेंबर – विजेच्या तारेला चिटकून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई (Gevrai) तालुक्यातील भेंडटाकळी तांडा राठोड वस्ती येथे घडली. ऐन सणासुदीच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक (Heartbreaking) दुर्घटनेमुळे गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथील राठोड वस्तीतील शेत शिवारात दोन लहान मुले शेतात खेळत असताना शेतात पडलेल्या विद्युत तारेचा शाॅक लागला. त्यात दोन मुले खाली पडली. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या आईला देखील शाॅक लागल्याने या घटनेत तिघाचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.3) शनिवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. ललीता श्रीकात राठोड (वय वर्ष 30), अभिजीत श्रीकांत राठोड (वय वर्ष 8), प्रशांत श्रीकांत राठोड (वय वर्ष 11) असे विद्युत तारेचा शाॅक लागुन मृत्यू झालेल्या आई व दोन मुलांची नांवे आहेत.
ऐन आज गौरीचे आगमन होत असताना घटलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे भेंडटाकळी तांडा येथे शोककळा पसरली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान, बीड (Beed) जिल्ह्यातील चौसाळा येथेही एका अन्य घटनेत एकाचा विजेचा शॉक (electric shock) लागुन मृत्यू झाला आहे. घरातील गिझरला हात लावल्याने तारेख अजीज कुरेशी याचा मृत्यू झाला आहे.
( Three people from the same family died due to electric shock; Heartbreaking incident in Beed district. )