मोठी बातमी…. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा. दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री?

मुंबई, 05 एप्रिल- अडचणीत सापडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे. आज सकाळीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांचेकडे नवे गृहमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Big news …. Home Minister Anil Deshmukh resigns. Dilip Walse Patil new Home Minister?)
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. ‘मुंबई हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे या सुद्धा हजर होत्या. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठरलं हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार, अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) अपील करतांना असे म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) म्हटले आहे की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. अशा वेळी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येते आहे. दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची धुरा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.