संपूर्ण लॉकडाऊनला व्यापाऱ्यांची सहमती; आज टास्क फोर्सच्या बैठकीनंतर होवू शकतो लॉकडाऊनचा निर्णय.

मुंबई दि.11 एप्रिल – संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय झाला असून, संपूर्ण लॉकडाऊन (lockdown) न झाल्यास दि. 8 रोजी झालेल्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम राहणार आहे, अशी माहिती राज्य कॅट संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप गांधी यांनी दिली. तर आज मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक होणार आहे त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली.

(Merchant consent to full lockdown; The decision of lockdown may be taken after the meeting of the task force today.)

रविवारी संध्याकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय झाला असून, संपूर्ण लॉकडाऊन (lockdown) न झाल्यास दि. 8 रोजी झालेल्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम राहणार आहे, अशी माहिती राज्य कॅट संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप गांधी यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे 10 एप्रिल रोजी ‘लॉकडाऊन व ब्रेक द चेन, पुढे काय?’ या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासदांची अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  ऑनलाइन बैठकीत  ही चर्चा झाली. यात गांधी यांनी कोरोनाचे संक्रमण वाढत आहे, अशा परिस्थितीत आपले थोडे नुकसान सहन करून संक्रमण साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन झाल्यास त्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शासनास सहकार्य करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करत शासनाकडे छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहिर करण्याची मागणी त्यांनी केली.

राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात कडक निर्बंध घालण्याची वेळ आली आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत राज्याच्या कोरोना परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी मांडली. रविवारी मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक होणार आहे त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडली भुमिका.
सर्वांचं ऐकूण जो निर्णय घ्याचा आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा. आमचं सहकार्य असेल. लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. गरीबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ऑक्सिजन संदर्भात नियमावली केली पाहिजे. रेमडीसीव्हिरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. काही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरचं मानधन कमी आहे. काळाबाजार थांबवायला आपण यशस्वी झालं पाहिजे, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केली. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तज्ज्ञांच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांनी सहमती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!