आ. प्रकाश सोळंके यांची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी दिल्लीत चर्चा …

बीड दि. 21 जुलै – आ. प्रकाश सोळंके यांची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी दिल्लीत मतदारसंघातील विविध प्रश्नावर चर्चा झाली. रस्ते विकासाच्या विविध विषयांसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी सकरात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ. सोळंके यांच्याकडून सोशल मिडीयातून सांगण्यात आले.
सद्यस्थितीला धारूर घाटात (Dharur Ghat) अनेक अपघात होऊन कित्येक निष्पाप जीवांना मृत्यूला सामोरं जावं लागतं आहे. त्या दृष्टीने धारूर घाट कटिंग करून हा रस्ता रुंदीकरण करण्याबाबत निवेदन गडकरी यांना आ. सोळंके यांनी दिले. माजलगाव शहरातील नाली बांधकाम करण्याबाबत व धारूर घाट रस्ता रुंदीकरण याबाबतचे दोन्ही प्रस्ताव मंजुरी करीता सादर करण्यात आली आहेत.
माजलगाव-तेलगाव रस्त्याचे निकृष्ट काम झाल्यामुळे रस्त्यावर बहुतांश ठिकाणी तडे गेले आहेत. यामुळे मोटारसायकल स्लिप होऊन अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. माजलगाव-परतूर रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने अद्यापपर्यंत ते पूर्ण झाले नाही, हे काम देखील निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. या दोन्ही रस्त्यांच्या विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदने दिली. या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, नितीन गडकरी यांनी सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत आ. सोळंके (MLA Prakash Solanke) यांना आश्वासन दिले.
( MLA Prakash Solanke talks with Union Minister Nitin Gadkari in Delhi… )