दिल्लीत उच्चस्तरीय बैठकाना वेग;
देशात चीन विरोधात रोष.

दिल्ली दि.१७(पिटिआय) काल चीन व भारतीय सैनिकात झालेल्या संघर्षात वीस भारतीय सैनिक शहिद झाल्यानंतर काल पासुन राजधानी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांना सुरुवात झाली होती. या बैठका आजही सुरु असून कालच्या घटनेनंतर देशात चीनच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
भारत व चीन दरम्यानच्या वास्तविक सिमा रेषेवरील गलवान घाटीत दि.१५ सोमवार रोजी दोन्ही कडील सैनिकात हिंसक संघर्ष झाला. यात भारताच्या कर्नल संतोष बाबु व दोन सैनिकांना वीर मरण आल्याची बातमी समोर आली होती. मात्र संध्याकाळ पर्यंत ही संख्या वाढून इतर १७ जखमी सैनिकासह २० जन शहिद झाल्याचा खुलासा करण्यात आला. ४५ वर्षातील भारत व चीन दरम्यान संघर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात जिवितहानी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे देशभर चीन विरोधात लोक रस्त्यावर येत असल्याचे दिसुन येत आहेत. या घटनेनंतर दिल्लीत प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री व गृहमंत्री यांची बैठक झाली. आज पुन्हा दिल्लीत उच्चस्तरीय बैठकींना वेग आला आहे. आजच्या बैठकीत सुरक्षा सल्लागार, तीन्ही सेना प्रमुख व परराष्ट्र मंत्र्यांचा समावेश आहे. यासोबच वादग्रस्त भागात चीन व भारतीय सेनेच्या मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांचीही बैठक होणार असल्याचे वृत्त आहे.