लॉकडाऊनच … दोन दिवसांत निर्णय; सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा.

मुंबई दि. 10 एप्रिल- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध व विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. परंतू विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्यामुळे संपुर्ण लॉकडाऊन लावण्याची चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक (all-party meeting) घेण्यात आली. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन (lockdown) करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री करत आहेत. राज्यात लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसात याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले.

(Lockdown …Decision of in two days; Chief Minister’s announcement in the all-party meeting.)

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सदरील बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. तात्याराव लहानेही या बैठकीत सहभागी झाले होते. सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे हे राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सर्वांना दिली.

बैठक सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. तर कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून अध्याप 1200 मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात रेमडिसीव्हरचा तुटवडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, बैठकीत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र अनुपस्थित होते. भाजपाने संपुर्ण लॉकडाऊनला (lockdown) विरोध दर्शवला आहे. बैठकीत भाजपकडून हातावर पोट असलेल्या लोकांसाठी आधी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशाच स्वरुपाचे मत काँग्रेसकडूनही मांडण्यात आले. मात्र कोरोना नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांसोबत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!