शेतकऱ्यांची चिंता वाढली… हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती.

मुंबई दि.19 जुन – महाराष्ट्रात मान्सून दाखल होवून दहा दिवसांपेक्षा जास्त काळ लोटत असताना अद्यापही राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. यामुळे राज्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. यातच हवामान विभागाने (Meteorological Department) शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. 20 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या 20 ते 25 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाची तीव्र प्रतीक्षा केली जात आहे. यंदा पाऊस लवकर येणार असल्याचा अंदाज देण्यात आल्याने शेतकरी वर्ग शेती मशागतीच्या कामाला लागला. पेरणीसाठी शेती सज्ज असून आता पावसाची ओढ बळीराजाला लागली आहे. आज उद्या म्हणता म्हणता 19 जुन उजाडला आहे. तरीही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने राज्यात पेरण्या खोळंबल्या आहेत.
नैऋत्य मान्सून (Southwest monsoon) महाराष्ट्रात दाखल होऊन जवळजवळ 10 दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र राज्यात कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आता मात्र मान्सूनने गती घेतली आहे. त्यामुळेच नैऋत्य मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागात पुढे सरकला आहे. प्रतिवर्षी उत्तर भारतात जाण्यापूर्वी मान्सून महाराष्ट्राला चिंब करत असतो. यंदा मात्र, मान्सूनने महाराष्ट्र कोरडा ठेवून उत्तर भारत गाठला आहे.
महाराष्ट्रात सध्या सर्वच भागात शेती मशागतीची कामे पुर्ण होवून पेरणीसाठी शेती सज्ज आहे. शेतकरी वर्ग बी बियाणे खरेदीसाठी रांगा लावून आहे. राज्यातील काही भागात 17, 18 व 19 तारखेला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र तोही खोटा ठरला. राज्याला सध्या मोठ्या पावसाची अत्यंत गरज असून ती गरज नेमकी कधी पूर्ण होणार याबाबत अद्यापही हवामान विभागाने स्पष्ट माहिती दिलेली नाही. परंतू 20 जून पासून मोठ्या पावासाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंतेत आणखीनच भर पढली आहे.
( Farmers’ worries increased … important information given by the meteorological department. )