शेतकऱ्यांना दिलासा; सहा विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून निधी वर्ग.

मुंबई दि.2 अॉक्टोंबर – खरीपातील सर्वच पीकाचे अतिवृष्टीमुळे (heavy rains) नुकसान झाले आहे. या दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा (Prime Crop Insurance) योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 साठी विविध पिक विमा कंपनीस (Crop Insurance Company) सरकारकडून राज्यशासनाच्या हिश्याची रक्कम अदा करण्यात आली आहे.
(Relief to farmers; Funding class from the state government to six insurance companies.)
राज्य सरकारने 6 विमा कंपन्यांना 973 कोटी 16 लाख 47 हजार 758 रुपये अदा केले आहेत. त्याअनुशंगाचा शासन निर्णयही (Government Decision) झाला असून ऐन गरजेच्या दरम्यान या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे.
भारतीय कृषी विमा कंपनी (Indian Agricultural Insurance Company) हि महाराष्ट्र राज्यातील पिक विमा कंपन्याची समन्वयक कंपनी आहे. ही रक्कम राज्य सरकारची असून यामध्ये केंद्र सरकारच्या रकमेचीही भर पडणार आहे. राज्यात वेगवेगळ्या सहा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून विमा भरुन घेतलेला होता.
यंदा पावसाने खरीपातील पीकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे विम्यापोटी तरी अधिक रक्कम मिळेस अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या राज्य सरकारने त्यांच्या हिश्याची रक्कम वर्ग केलेली आहे. काही दिवसांमध्ये केंद्र सरकारही आपली रक्कम वितरीत करणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना पीकाचा विमा मिळणार आहे.