सार्वजनिक शौचालयाच्या पाण्यामुळे होतोय नागरिकांचा त्रास; आमरण उपोषणाचा मार्ग

किल्लेधारूर दि.१५ (वार्ताहर ) धारूर शहरातील कसबा विभाग येथील मठ गल्ली भागात सार्वजनिक स्वच्छालया चे पाणी विरुद्ध दिशेने काढल्यामुळे तेथील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठा त्रास होत आहे या त्रासाला कंटाळून त्यांनी नगरपरिषद मध्ये निवेदन देऊनही त्यावर लक्ष न दिल्यामुळे १५ जुन पासून नागरीकानी तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत.
सार्वजनिक स्वच्छालयाचे चे पाणी विरूद्ध दिशेने काढुन देऊन नगरपरिषदेचे दुर्लक्षामुळे सार्वजनिक स्वच्छालयाचे पाणी येथील काही लोकांच्या अतिक्रमणा मुळे सार्वजनिक स्वच्छालया चे पाणी विरूद्ध दिशेने काढुन दिल्याने या भागातील नागरीकाना ञास होतं आहे. या मुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला व लहान मुलांना याचा खूप त्रास होतो. यामुळे या भागातील नागरीक सोमवार पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत घाण पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत असा इशारा मुकुंद साखरे, महेंद्र गरडे, भागवत शिनगारे, अनिल गव्हाणे, अरूण साखरे, दत्ता साखरे, कृष्णा गरडे या नागरिकांनी दिला आहे. या उपोषणकर्त्याची नगरसेवक बाळासाहेब खामकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे सुधिर शिनगारे यांनी भेट घेऊन भावना जाणून घेतल्या. मुख्यधिकारी यांना संपर्क करून तात्कळ प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.