आंतरराष्ट्रीय माध्यमांची भारत सरकारच्या नियोजनावर टीकास्त्र; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडाला असून जगातून भारताच्या मदतीसाठी अनेक देश व उद्योग समुह पुढे येत आहेत. अशातच जागतिक माध्यमातून मात्र भारत सरकारच्या (Government of India) नियोजनावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. ऑक्सिजन पुरवठा सर्व रुग्णांसाठी उपलब्ध न होणे, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, कोरोना लसींबाबतचं चुकीचं नियोजन अशा अनेक मुद्द्यांवरून आंतरराष्ट्रीय माध्यमांनी (International media) भारत सरकारच्या (Government of India) नियोजनावर टीकास्त्र उगारलं आहे.
(International media commentary on Government of India’s planning; What did Prime Minister Modi say?)
भारतात (India) कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत सुरुवातीला दैनंदिन 1 लाख नवे रुग्ण आढळत होते. ही संख्या आता 3 लाखांच्याही वर पोहोचलीय. भारतातील आरोग्य व्यवस्था अपुरी असून अनेक रुग्ण बेड अभावी मृत्युमुखी पडत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (The second wave of the corona) तर आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा अधिक ठळकपणे जगासमोर आल्यात. यावरून आता आंतरराष्ट्रीय वृत्तसमुहांमधून भारतातील कोरोनाच्या हाताळणीवर टीका होऊ लागली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (The second wave of the corona) भारतीय आरोग्य व्यवस्था कोसळत असून अनेक मुलभूत बाबींची कमतरता रुग्णांना जाणवू लागल्याची टीका न्यूयॉर्क टाईम्सनं (New York Times) केली आहे. ऑक्सिजन पुरवठा सर्व रुग्णांसाठी उपलब्ध न होणे, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, कोरोना लसींबाबतचं चुकीचं नियोजन अशा अनेक मुद्द्यांवरून आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारत सरकारच्या नियोजनावर टीकास्त्र उगारलंय.
भारताने निर्बंध फार लवकर सैल केल्याची टीका वॉशिंग्टन पोस्टनं (The Washington Post) केलीय. साथीत वेळेला आणि अंतराला खूप महत्त्व असते, हे सरकार विसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. तर चुकीच्या निर्णयांनी भारतातील पेच आणखी गंभीर केला आणि त्यात आत्मसंतुष्टता भोवली, असं निरीक्षण न्यूर्यार्क टाईम्सनं (New York Times) नोंदवलंय. तर मोदींचा अतिआत्मविश्वास भारतवासियांना भोवल्याची टीका द गार्डियननं (The Guardian) केलीय.
भारतानं दुसऱ्या लाटेला जो प्रतिसाद दिला, त्यात अनेक कच्चे दुवे आहेत आणि त्यातून इतर देशांनी धडा घेण्याची गरज असल्याचं यात म्हणण्यात आलंय. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अद्यापही उच्चांक गाठला नसल्याचं निरीक्षण काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोनाग्रस्तांचे आकडे दिवसेंदिवस वाढत असून लवकरच या लाटेचा कळस गाठून उतरण सुरू होईल,असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
“मेलेल्या सरकारी व्यवस्थेचा माहूत” या शीर्षकाखाली एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रसिद्ध जागतिक व्यंगचित्रकार डेव्हिड रोवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीचे रेखाटलेले व्यंगचित्र भारत देशाची झालेली अवस्था जगासमोर मांडणारी आहे. या व्यंगचित्राने सध्या सोशल माध्यमात खळबळ उडवली आहे.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा सर्वच राज्यात जाणवत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून दररोज 2 हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे. देशातील अनेक राज्यांमधील स्मशानभूमींमध्ये येणाऱ्या मृतदेहांचा आकडा आणि प्रशासनाकडे असलेली मृतांची आकडेवारी यात खूप मोठी तफावत आहे. प्रशासन आणि राजकारणी मिळून कोरोना मृतांचा आकडा लपवत असून खरी संख्या पाचपट असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 95 हजार 123 इतकी आहे.
दुसऱ्या लाटेने आपल्याला मुळापासून हलवून सोडले-पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनाची दुसरी लाट आपला संयम आणि सहनशक्तीची परीक्षा पाहात आहे. आपल्यातील अनेकांचे निकटवर्तीय आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत. आपण पहिल्या लाटेचा खूप धैर्याने मुकाबला केला. मात्र, दुसऱ्या लाटेने आपल्याला मुळापासून हलवून सोडले आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केले.
या लाटेशी मुकाबला करण्यासाठी मी अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यात औषध क्षेत्र, ऑक्सिजन उत्पादन अशा अनेक क्षेत्राचा समावेश होता. आमचे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स आज करोनाविरुद्धचे महत्त्वाचे युद्ध लढत आहेत. गेल्या वर्षी त्यांना या स्वरूपाच्या अनेक अनुभवांना सामोरे जावे लागले. करोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य देण्यात येईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्पष्ट केले.