दुर्दैवी… बापलेकीचा अपघातात मृत्यू; शाळेत सोडताना अज्ञात वाहनाने उडवले.

लातूर दि.31 जानेवारी – लातूर (Latur) शहरालगतच्या म्हाडा कॉलनी समोरील रस्त्यावरुन मुलीला शाळेत घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद (Teacher) शिक्षकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने (Accident) धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी घडली असून या अपघातात बाप व लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
(Unfortunate … father and daughter die in an accident; An unidentified vehicle blew up while leaving the school.)
सदरील धडक एवढी जोराची होती की दुचाकीवरील शिक्षक आणि त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय पांचाळ (38) आणि मुलगी प्रतीक्षा पांचाळ (13) अशी मृतांची नावे आहेत.
दत्तात्रय पांचाळ हे मुळचे लातूर तालुक्यातील भुसणी येथे वास्तव्यास होते. मात्र, मुलगी प्रतीक्षा ही (Latur) लातूरातील ज्ञानेश्वर इंग्लिश स्तूलमध्ये इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकत होती. त्यामुळे तिचे वडील दत्तात्रय पांचाळ हे तिला दररोज लातूर येथे शाळेत सोडून पुन्हा पानचिंचोली येथे सेवा बजावण्यासाठी जात होते.
नेहमीप्रमाणेच सोमवारी सकाळी मुलीला घेऊन ते लातूरला येत असताना म्हाडा कॉलनी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेच ही दुर्घटना (Accident) घडली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या संबंधी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
दत्तात्रय पांचाळ यांची काही दिवसापूर्वीच जिल्हा अंतर्गत बदली झाली होती. त्यांचे मुळ गाव हे भुसणी तर पानचिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेवर ते शिक्षक होते. मात्र, मुलगी प्रतीक्षा ही लातूरातील शाळेत असल्याने ते रोज अगोदर मुलीला दुचाकीवरुन शाळेत सोडत असत व नंतर पानचिंचोलीकडे मार्गस्थ होत असत.
हे त्यांचे नित्याचेच काम आज मात्र शेवटचे ठरले. सोमवारी सकाळी ते भुसणी येथून लातूरकडे निघाले होते. दरम्यान, शहरा लगत असलेल्या म्हाडा कॉलनीजवळ येताच अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेचे बळी
लातूर-बाभूळगाव या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडलेले आहे. शिवाय या मार्गावर रहद्दारी अधिक असून रस्त्याचे काम कासवगतीने होत आहे. त्यामुळे लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत.
वर्दळीचा भाग
शिवाय या भागातूनच लातूर-नांदेड (Latur Nanded) हा बाह्यमार्ग (Ring Road) जात असल्याने मोठी वर्दळ असते. गेल्या सहा महिन्यापासून रस्त्याचे काम सुरु असून केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचे प्रमाण हे वाढत आहे.