ज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू ; बीड जिल्ह्यातील घटना.

बीड दि.25 सप्टेंबर – ज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील हे तरुण होते. तुळजापूरकडे जात असताना येरमाळ्याजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार (Accidental Death) झाले.
( Two youths who went to fetch the flame died in an accident; Incidents in Beed District.)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आष्टी (Ashti) तालुक्यातील सांगवी पाटण येथे प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात घट स्थापना करण्यासाठी तुळजापूर येथुन ज्योत आणण्याची प्रथा आहे. यासाठी अनेक तरुण तुळजापूरला जात असतात. यावर्षीही सोमवारी घटस्थापना असल्याने ज्योत आणण्यासाठी गावातील 50 तरुण शनिवारी तुळजापूरकडे रवाना झाले. यात आरोग्यसेवक महेश भास्करराव भोसले (वय 31) व गावचे उपसरपंच अमोल सुरेशराव खिलारे (वय 28) यांचा समावेश होता. हे दोघे ज्या दुचाकीवरुन जात होते त्या दुचाकीस येरमाळा येथे रात्री 9 च्या सुमारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
गेल्या दोन दशकात तुळजापूर येथून पेटती मशाल ज्योत रुपात नेण्याची नवी परंपरा सर्वत्र सुरु झाली आहे. तुळजापूर (Tuljapur) येथील देवस्थान समितीने व स्थानिक प्रशासनाने वाढत्या प्रथेमुळे याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मात्र या प्रकारामुळे अपघातांची संख्या वाढली असून अनेक तरुणांचा बळी जात आहे. यामुळे अशा स्वंयसेवकांना सतत सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असते. बीड (Beed) जिल्हाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून ज्योत आणण्यासाठी शेकडो तरुण तुळजापूरकडे रवाना होतात. दोघा तरुणांच्या अपघाती निधनानंतर पुन्हा तरुणांना रस्ते अपघाताविषयी सतर्कता बाळगून वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.