
केज दि.२२(प्रतिनिधी) केज तालुक्यातील कासारी येथे गावातील काही तरुणांनी ग्रामसुरक्षा दल स्थापन करत गावात नवीन येणाऱ्या पाहूणे व अज्ञात व्यक्तीं व वाहनांना प्रवेश बंद करण्याचा चंग बांधला असुन गावातून जाणारा मुख्य रस्ता बंद केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, धारूर ते केज मुख्य रस्त्यावर पोलीस गस्ती पथक असल्याने कासारी गावातून चोरटी वाहतूक केली जाते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या मुळे कासारी ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काल रात्री मुंबईहून सहा लोक असलेली गाडी कासारी गावात आली. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे सकाळी तात्काळ ग्रामपंचायत च्या वतीने गावाकडे येणारा आणि जाणारा मुख्य रस्ता बंद केला आहे. रात्री मुंबईहून आलेल्या माणसाची चौकशी करत, त्यांना गावाबाहेर हाकलले, आप आपली काळजी घेत आपला गाव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना कासारी ग्रामपंचायतचे सरपंच सुखदेव वायबसे, शिवशाला वायबसे, ग्रामसेवक नागरगोजे, तलाठी रोडे मॅडम कासारी गावातील काही तरुणांना ग्रामसुरक्षा दल स्थापन केले. आजपासून हे सर्व तरुण रात्रंदिवस गावची सुरक्षा करणार असून गावात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्या वर लक्ष ठेवून आहेत. गावातील लोक सोडता बाहेरचा एकही माणूस गावात येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. गावातील प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी गावाला सहकार्य करत आहे. धारूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांचे देखील बारीक लक्ष आहे. गावातील प्रत्येक हालचालीवर, ग्रामपंचायतचे देखील लक्ष आहे. कासारी गावात फवारणी करत, गावातील सहाशे कुटुंबांना सॕनीटायझर च्या बाटल्या वाटल्या. यावेळी गावचे उपसरपंच उत्तम डोईफोडे, राजाभाऊ डोईफोडे, अण्णासाहेब वायबसे, रंजीत वायबसे, जयदेव वायबसे, संदीप वायबसे, विकास हजारे आदी ग्रामस्थ गावातील हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.