अंबाजोगाई पुन्हा हादरली; गुरुवारी घडली खूनाची घटना

अंबाजोगाई दि.11 मार्च – काही दिवसांपुर्वी घडलेल्या खूनानंतर आज पहाटे पुन्हा एका ३८ वर्षीय तरुणाचा जून्या भांडणाच्या कारणातून खून (Murder) झाल्याची घटना घडली असून जिल्ह्यात शांतता प्रिय व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखले जाणारे अंबाजोगाई (Ambajogai) शहर सध्या खूनाच्या सत्रामुळे चांगलेच हादरले आहे. पोलिसांनी (Police) या घटनेत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

(Ambajogai shuddered again; The murder happened on Thursday)

शहरातील मंगळवार पेठ भागात गुरुवारी (दि.११) पहाटे एका तरूणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डोक्यात जबर मार लागल्याने सदर तरुणाचा खून (Murder) झाल्याची माहिती मिळाली आहे. नितीन उर्फ बबलू साठे (वय ३८) असे मृत तरूणाचे नाव असून जून्या भांडणाच्या कारणातून खून झाल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील मंगळवार पेठ भागात बुधवारी रात्री १२.३० वाजताचा सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून मयत तरुणाचा काही व्यक्तींसोबत वाद झाला. या वादातून झालेल्या मारहाणीत डोक्याला गंभीर इजा होऊन नितीनचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून पोलिसांनी (Police) दोन संशयित ताब्यात घेतले आहेत. मात्र मुख्य संशयित फरार असल्याचे कळते.

काही दिवसापूर्वीच शहरा लगतच्या मोरेवाडी परिसरात गणेश मोरे या तरुणाचा भर रस्त्यावर तलवारीने निर्घुण खून करण्यात आला होता. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. या धक्क्यातून शहर सावरत नाही तोच गुरुवारी पहाटे भांडणातून पुन्हा एक खून झाल्याची घटना घडली. यामुळे एरवी शांततेसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या अंबाजोगाई (Ambajogai) शहराच्या प्रतिमेवर या दोन घटनांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!