पुन्हा भीषण अपघात… रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १४ जणांवर काळाचा घाला..

सुरतः दि.१९- गुजरात मधील सुरत नजीक पिपलोद गावात भीषण अपघात (Accident) झाला असून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १८ मजुरांना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले आहे. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मध्यरात्री नंतर हा अपघात झाला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने हा अपघात (Accident) घडला. ट्रक रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १८ जणांच्या अंगावरुन गेला. मयत मजूर राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील रहिवाशी आहेत. मयतात एका लहान मुलीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे. अपघातात चार मजुर गंभीर जखमी झालेले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरील अपघाताची चौकशी पोलिस (Police) करत आहेत.