दोन उपोषणकर्त्यां महिलांची प्रकृती डासळल्यानंतर प्रशासनाला आली जाग;
तिसऱ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले.

किल्लेधारूर दि.24 जून – रुईधारूर येथील धारूर पंचायत समिती समोर व रुईधारूर ग्रामपंचायत समोर तिन दिवसा पासून सुरू होते. समाजमंदिरा समोरिल अतिक्रमण हलवण्याच्या मागणीसाठीच्या या आमरण उपोषणातील दोन महिलांची (Fasting women) प्रकृती डासळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी (Collecter) दखल घेताच उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासना दिल्यानंतर सदरील उपोषण मागे घेण्यात आले.
(The administration woke up after the health of two fasting women deteriorated;)
तालुक्यातील रुई धारूर येथे समाज मंदिरा समोर असणारे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी येथील पुरुष मंडळी धारूर पंचायत समिती कार्यालया समोर तर महिला रुई धारूर ग्रामपंचायत समोर सोमवारी आमरण उपोषणास बसले होते. तीन दिवसा पासून धारूर (Dharur) येथील गटविकास अधिकारी रजेवर असल्याने एक ही अधिकारी व कर्मचारी या उपोषणकर्त्या याकडे फिरकले नव्हते.
यामुळे तीन दिवसा पासून महिला उपोषणकर्त्यांची (Fasting women) प्रकृती गंभीर असल्याने मंगळवारी एका महिलेस अंबाजोगाई येथे (SRTR) हलवण्यात आले तर बुधवारी दोन महिलांना धारुर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र या उपोषणकर्त्यांनी मागणी पूर्ण झाल्या शिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार केला होता. अखेर जिल्हाधिकारी (Collecter) रविंद्र जगताप यांच्या कानावर ही बाब जातात त्यांनी तात्काळ धारूर तहसील प्रशासनास यामध्ये दखल देण्यास भाग पाडले.
येथील नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी पुढाकार घेऊन सर्व प्रशासकीय यंत्रणा हाताळत या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी लेखी आश्वासन देण्यास पंचायत समिती प्रशासनास भाग पाडले. यावेळी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बुधवारी पंचायत समिती समोर या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तहसीलदार वंदना शिडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी उपोषणकर्त्यांची धारूर पंचायत समिती व ग्रामपंचायत समोर बसलेल्या महिलांची भेट घेऊन एक महिन्यांमध्ये कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
दरम्यान, मंगळवारी एका उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती अस्वस्थ झाल्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात (SRTR) हलवण्यात आले होते. तर बुधवारी दोन महिलांना धारुर (Dharur) ग्रामीण रुग्णालयात हलवण्याची वेळ आली होती. या महिलांची प्रकृती स्थिर असून तिसऱ्या दिवशी प्रशासनाने उपोषणाची दखल घेत उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलकांनी एक महिन्यानंतर कारवाई न झाल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला.